AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad corona Update : घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एका बेडवर 3 रुग्ण!

रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे

Aurangabad corona Update : घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एका बेडवर 3 रुग्ण!
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील कोरोना रुग्णांची अवस्था अतिशय विदारक आहे
| Updated on: Mar 24, 2021 | 11:48 PM
Share

औरंगाबाद : राज्यातील कोरोनाची स्थिती विदारक बनत चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पण अशा परिस्थितीतही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.(Shweta Mahale criticizes state government over corona patients’ condition at Ghati Hospital)

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील विदारक चित्र मांडणारे काही फोटो ट्वीट केलेत. या फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ऑक्सिजनची नळी नाकाला लावून हे रुग्ण उपचार घेत असल्याचं टा फोटोंमधून पाहायला मिळत आहे.

आमदार श्वेता महालेंची राज्य सरकारवर टीका

“सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे. तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील. तसेच कोरानाच्या संकटामधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल.औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती”, असं ट्वीट करत श्वेता महाले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.

औरंगाबादेतील कोरोना स्थिती –

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात 552 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर औरंगाबाद महापालिका क्षेत्रात 899 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर महापालिका आणि जिल्ह्यात मिळून 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत 73 हजार 750 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी 2021 मधील सर्वाधिक रुग्णसंख्या

राज्यात आज 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

संबंधित बातम्या : 

Corona Update : कोरोना रोखण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन केली जाणार? अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Maharashtra Corona Update : 2021 मधील सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजार 855 जण पॉझिटिव्ह!

Shweta Mahale criticizes state government over corona patients’ condition at Ghati Hospital

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.