AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | लेबर कॉलनीनंतर जिल्हा प्रशासनाचा मोर्चा आता हर्सूल रस्ता रुंदीकरणाकडे! 102 मालमत्तांचा निर्णय लवकरच!

हर्सूल येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाला एकूण 102 मालमत्ता ताब्यात घ्यायच्या आहेत. यात 89 मालमत्तांवर घरं असून इतर रिकाम्या जागा आहेत.

Aurangabad | लेबर कॉलनीनंतर जिल्हा प्रशासनाचा मोर्चा आता हर्सूल रस्ता रुंदीकरणाकडे! 102 मालमत्तांचा निर्णय लवकरच!
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 12:40 PM
Share

औरंगाबादः विश्वास नगर लेबर कॉलनी (Labor colony) येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न बुधवारी मार्गी लावल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने हर्सूल (Harsul) भागातील रस्ता रुंदीकरणाकडे मोर्चा वळवला आहे. हा रस्ता रुंद करण्यासाठी या भागातील अनेक मालमत्ता बाधित होणार आहेत. त्यांची नेमकी संख्या किती आहे, किती मोबदला देणे योग्य आहे, याबद्दलची तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. लवकरच त्यांना मोबदला देऊन या भागातील मालमत्ताही भूईसपाट केल्या जातील. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्ता रुंदीकरण काम मार्गी लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे (District collector) नियोजन आहे. हा रस्ता 30 मीटर रुंद आणि 400 मीटर लांब तयार केला जाणार आहे. हर्सूलच्या या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कायमची संपेल.

रस्ता रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत नागरिक

हर्सूल येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाला एकूण 102 मालमत्ता ताब्यात घ्यायच्या आहेत. यात 89 मालमत्तांवर घरं असून इतर रिकाम्या जागा आहेत. कागदोपत्री ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे या मालमत्तांना किती मोबदला द्यावा लागणार याची माहिती पुढील तीन दिवसात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्या आहेत. मोबदल्याची रक्कम ठरल्यानंतर संबंधितांना तत्काळ दिली जाणार आहदे. त्यानंतर घरं रिकामी करण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे.

लेबर कॉलनी कारवाईत किती अधिकृत किती अनधिकृत?

लेबर कॉलनीतील 338 घरांची पाडापाडी बुधवारी करण्यात आली. यापैकी केवळ 49 घरांमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी व 12 जण सध्या सेवेत असलेले कर्मचारी राहता होते. बाकी सर्व बेकायदेशीर राहणारे रहिवासी होते, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. या कारवाईनंतर रिकाम्या गोणाऱ्या जागेवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रसासकीय इमारत उभारण्याचे नियोजन आहे.

Follow Us
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.