AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | पाण्यासाठी औरंगाबादकरांचा आक्रोश तीव्र, 24 तासांपासून जलकुंभावर मुक्कामी, प्रशासन काय भूमिका घेणार?

मनपा प्रशासकांनी एक महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन हवेतच विरल्यानं भाजपाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पुन्हा एकदा मुक्कामी आंदोलन सुरु केलं आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाहीत, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

Aurangabad | पाण्यासाठी औरंगाबादकरांचा आक्रोश तीव्र, 24 तासांपासून जलकुंभावर मुक्कामी, प्रशासन काय भूमिका घेणार?
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 07, 2022 | 10:43 AM
Share

औरंगाबादः शहरात आठ दिवसांच्या खंडाने पाणीपुरवठा (Water Supply) होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांचा कालपासून सुरु केलेलं आंदोलन (Protest) अजूनही सुरुच आहे. सिडको एन-7 जलकुंभावर नागरिकांनी हे मुक्कामी आंदोलन सुरु केलं आहे. रात्रभर नागरिक आंदोलनाच्या (Aurangabad agitation) ठिकाणी बसून होते. रात्रभर भजन करत नागरिकांनी पाण्यासाठी टाहो फोडला. सकाळीदेखील आमच्या हक्काचं पाणी द्या, अशा घोषणा नागरिक देत आहेत. मागील एप्रिल महिन्यातदेखील नागरिकांनी अशाच प्रकारचं आंदोलन केलं होतं. त्यावेळी मनपा प्रशासकांनी एक महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन हवेतच विरल्यानं भाजपाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पुन्हा एकदा मुक्कामी आंदोलन सुरु केलं आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाहीत, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

‘मनपाचं आश्वासन हवेत विरलं’

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी महिनाभरापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप पाणीपुरवठ्यात काहीही सुधारणा झालेली दिसून आली नाही. त्यामुळे शुक्रवारी भाजप-मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एन-7 जलकुंभावर मुक्कामी आंदोलन सुरु केलं. त्यापूर्वी हाडको येथील पवन नगरात सात दिवसांपासूसन पाणी न आल्याने एका शिवसैनिकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतलं. मात्र एन-7 जलकुंभावरील नागरिकांचं आंदोलन सुरुच आहे.

आंदोलनातही श्रेयवादाची लढाई

भाजपा आणि मनसेच्या पुढाकारातून सुरु झालेल्या या आंदोलनातही श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं चित्र आहे. काल ज्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा इशारा दिला, ते ललित सरदेशपांडे हे शिवसैनिक असून दीड वर्षांपूर्वीच ते मनसेतून शिवसेनेत आले आहेत. या वॉर्डातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असल्याची चर्चा आहे. सरदेशपांडेंची भेट घेण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि नंदकुमार घोडेले पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी स्मार्ट सिटी व्यवस्थापनालाच धारेवर धरले. मात्र 2005 पासून औरंगाबादला मुबलक पाणी मिळवून देतो, असं आश्वासन त्यांनीही दिलं होतं हे ते विसरले. पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पाणीपुरवठा विभागप्रमुखांची बदली करतो, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला. तर भाजपाच्या नेतृत्वात आंदोलकांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. मर्सिडीज बेबी काय म्हणतो, पाणी द्यायचं नाही म्हणतो… बारामतीचा पोपट काय म्हणतो, पाणी द्यायचं नाही म्हणतो.. अशा घोषणांनी आंदोलनाचा परिसर दणाणून गेला आहे.

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?