AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | पहिलं घर घ्यायचा विचार करताय? 31 मार्चपर्यंतच मिळणार पंतप्रधान योजनेचे अडीच लाख!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर देशात सर्वांना घर हा उद्देश ठेवत पंतप्रधान आवास योजना (PM Awas Scheme) राबवण्यास सुरुवात केली. याअंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या नागरिकांनी गृहकर्जासाठी (Home Loan) 2 लाख 67 हजार रुपयांची सबसिडी (Subsidy) दिली जाते.

Aurangabad | पहिलं घर घ्यायचा विचार करताय? 31 मार्चपर्यंतच मिळणार पंतप्रधान योजनेचे अडीच लाख!
सांकेतिक छायाचित्र
| Updated on: Mar 11, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर देशात सर्वांना घर हा उद्देश ठेवत पंतप्रधान आवास योजना (PM Awas Scheme) राबवण्यास सुरुवात केली. याअंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या नागरिकांनी गृहकर्जासाठी (Home Loan) 2 लाख 67 हजार रुपयांची सबसिडी (Subsidy) दिली जाते. जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून येत्या काळात योजनेचा लाभार्थी बनण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठीच ही बातमी आहे. या योजनेची मुदत येत्या 31 मार्च 2022 रोजी संपत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे घर खरेदी करण्याचा आणि होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर निर्णय तुम्हाला काही दिवसातच घ्यावा लागेल.

कशी आहे नेमकी योजना?

ज्या ग्राहकाला पहिल्यांदा स्वतःच्या नावाने घर खरेदी करायचे असेल, तसेच गृहकर्ज आणि रजिस्ट्रीत स्वतःच्या पत्नीचे नाव लावायचे असेल अशांसाठीच ही अडीच लाखांची सबसिडी मिळते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 18 लाख रुपयांदरम्यान आहे, अशा गृहकर्जधारकांना योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्यांचे उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे, त्यांना 6 लाखांच्या कर्जावर 6.5 टक्के सबसीडी, 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 9 लाखांच्या कर्जावर 4 टक्के सबसीडी तर 18 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 12 लाखांच्या कर्जावर 3 टक्के सबसीडी मिळते.

31 मार्चपुर्वी फाईल अपलोड होणे आवश्यक

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसीडीचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत 31मार्च 2022 अशी ठेवलेली आहे. या योजनेअंतर्गत पहिले घर खरेदी करताना गृहकर्ज घेतल्यावर बँका ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांचा अर्ज भरून घेतात. योजनेच्या सबसिडीसाठीचा अर्ज पोर्टलवर अपलोड करावा लागतो. त्यानंतर 5 व्या टप्प्यात सबसिडी गृहकर्ज खात्यात जमा होते. योजनेची मुदत 31 मार्च असली तरीही काही बँका 15 मार्च, 22 मार्चपर्यंतच ग्राहकांना मुदत देत आहेत. त्याच्या आत जर तुमचा अर्ज पोर्टलवर अपलोड झाला तरच सबसिडी मिळेल, असे सांगितले जात आहे.

इतर बातम्या-

Chernobyl मध्ये वीजपुरवठा खंडित, झापोरिझ्झियामधून डेटा ट्रान्समिशन बंद; युक्रेनच्या अणु प्रकल्पातील परिस्थिती गंभीर!

Video : केजरीवालांनी लिहून दिलं होतं आणि जशास तसं घडलं, मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर पराभूत, पाहा व्हिडिओ

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.