AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Schools | औरंगाबादमध्ये आजपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू, लसीकरण आणि चाचण्यांचे नियम काय?

सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शंभराच्या आतच नोंदवली गेली. जिल्ह्यात एकूण 84 जण कोरोना बाधित आढळले. तर पाच जणांचा मृत्यू झाला.

Schools | औरंगाबादमध्ये आजपासून पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू, लसीकरण आणि चाचण्यांचे नियम काय?
नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा फक्त सकाळीच भरतील. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 10:56 AM
Share

औरंगाबादः शहरातील महापालिकेच्या (Aurangabad Schools in City) हद्दीतील शाळांचे पाचवी ते सातवीचे वर्ग आज मंगळवारपासून सुरु झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहर आणि जिल्ह्यातील सर्वच शाळांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने (Online schools) घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर रुग्ण संख्या आटोक्यात येऊ लागल्याने टप्प्या-टप्प्याने जिल्हा आणि शहरातील शाळा सुरु होत आहेत. त्यानुसार, सोमवारपासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून शहरातील पाचवी ते सातवीचे वर्गही सुरु करण्यात येतील, असा निर्णय झाला होता. मात्र गान सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुटी घोषित करण्यात आली. त्यामुळे औरंगाबाद शहरातील शाळांनाही सोमवारी सुटी देण्यात आली. आज मंगळवारपासून पाचवी ते सातवीचे वर्ग पुन्हा एकदा सुरु झाले आहेत.

शाळा सुरु, नियम कोणते?

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यास महापालिकेने परवानगी दिली. त्यासाठी काही नियमदेखील लावण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे- – शाळा सुरु करण्यापूर्वी 48 तासापूंर्वी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांची RTPCR चाचणी बंधनकारक असेल, असे महापालिकेने कळवले होते. – विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून लेखी संमती घेण्यात यावी. – प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहन चालक, कंडक्टर, रिक्षाचलक यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. – विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार, टप्प्या-टप्प्याने शाळेत तसेच एका दिवसाआड बोलवावे. – कोरोना नियमांच्या पालनासह शाळेत गर्दी करणे टाळावे.

सोमवारी जिल्ह्यातील कोरोना स्थिती काय?

सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या शंभराच्या आतच नोंदवली गेली. जिल्ह्यात एकूण 84 जण कोरोना बाधित आढळले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट पहायला मिळाली. या लाटेत बाधित रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र रुग्णांना तीव्र लक्षणे नव्हती. गंभीर बाब ही की, जानेवारी महिन्यात 51 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 39 जण शहरातील आहेत. 1 जानेवारीपासून शहरात कोरोना संसर्ग वाढत गेला. बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत जाऊन शहराला कोरोनाचा घट्ट विळखा पडला होता. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांचे सर्व वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरु असून शहरातील पाचवीच्या पुढील सर्व वर्ग सुरु झाले आहेत. आता फक्त पहिली ते चौथीचे वर्ग कधी सुरु होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

Nagpur Pollution | नांदगाव येथील राखेचे प्रदूषण कमी होणार काय?; आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक, टि्वटवरून दिली माहिती

Shivaji Park ला शिवाजी पार्कचं ठेवावं, त्याचं स्मशानभूमी करु नका : प्रकाश आंबेडकर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.