AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | शहराचं पाणी वाढवण्यासाठी आजपासून मनपाची मोहीम, हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी उपसा करणार

हर्सूल तलावातून दररोज किमान 6 एमएलडी पाणीउपसा होत असून तो दिवसाला 08 ते 10 एमएलडीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Aurangabad | शहराचं पाणी वाढवण्यासाठी आजपासून मनपाची मोहीम, हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी उपसा करणार
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 09, 2022 | 9:42 AM
Share

औरंगाबादः उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची मागणी (Water demand) दिवसेंदिवस वाढत आहे. जायकवाडी जलायशयातून येणारे पाणी अपुरे पडत असल्याने आता हर्सूल तलावातून (Harsul Lake) अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी या तलावापासून जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येत आहे. आजपासून महापालिकेने (Aurangabad municipal corporation) ही मोहीम हाती घेतली असून यानंतर तरी शहराची पाण्याची तहान भागतेय का? शहराला चार दिवसांनी पाणीपुरवठा होऊ शकेल का? असे प्रश्न नागरिकांना पडले आहे. दरम्यान, महापालिकेने रविवारीच यासाठी लागणारे पाइप ओआणून ठेवले असून आज सोमवारपासून अतिरिक्त पाणीउपसासाठीचे काम सुरु होणार आहे.

किती पाणी उपसा वाढवणार?

हर्सूल तलावाची 28 फुटांची क्षमता आहे. वर्षभरात 08 फूट पाणी कमी झाले. तलावात सध्या 20 फूट पाणी आहे.  त्यामुळे मे महिन्यात शहराला पाणी मिळू शकते, असा महापालिकेचा अंदाज आहे. पाण्याचा उपसा वाढवण्यासाठी 350 मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी हर्सूल तलाव ते जटवाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येणार आहे. हे अंतर 700 मीटर एवढे आहे. रविवारी पाइप आणण्यात आले. तीन ते चार दिवसात जलवाहिनी टाकण्याचे काम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. हर्सूल तलावातून दररोज किमान 6 एमएलडी पाणीउपसा होत असून तो दिवसाला 08 ते 10 एमएलडीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सिडकोला एमआयडीसीची मदत

सिडको एन-1 भागात एमआयडीसीचे पंप हाऊस असून तेथून मनपा कंत्राटदाराचे काही टँकर भरण्यात येतात. एमआयडीसीने शनिवारी 40 ते 45 टँकर भरून दिले. उन्हाळा संपेपर्यंत रोज एक एमएलडी पाणी एमआयडीसी मनपाला देणार आहे. त्यामुळे एन-5 आणि एम-7 येथील जलकुंभाला दिलासा मिळाला. शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत एवढा असंतोष का आहे, याचे कारण शोधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?