AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात.

Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेसमोर आंदोलन
| Updated on: Apr 02, 2022 | 10:57 AM
Share

औरंगाबाद | नाशिक, पुण्यासारख्या शहरात रोज पाणीपुरवठा (Water Supply) होऊनदेखील तेथे 1500 रुपये पाणीपट्टी आहे. मग औरंगाबादला (Aurangabad) आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना 4,500 रुपये पाणीपट्टी का, असा सवाल औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) कार्यकर्त्यांनी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले. शहरात दहा दिवसाआड पाणी येते. तेदेखील गढूळ आहे. त्यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. काहींचा तर मृत्यूही झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे शुद्ध आणि नियमित पाणी नसेल तर पाणीपट्टीही मिळणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.

प्रशासकांनी ऐनवेळी गैरहजर

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. मात्र वेळ देऊनही पांडेय हे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी मनपातच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. मनपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासकांनी सदर निवेदन स्वीकारण्याचा निरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता. तसेच त्यांनी व्हॉट्सअपद्वारे निवेदन मागवून घेतल्याचेही सांगण्यात आले.

पाणीपुरवठ्यावर खर्च 140 कोटी, उत्पन्न 36 कोटी

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र महापालिकेला या पाणीपुरवठा योजनेसाठी वर्षाला तब्बल 140 कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असून पाणीपट्टीपोटी महापालिकेला यंदा केवळ 36 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात 100 कोटींपेक्षा जास्त तोटा आहे.

पाणीपुरवठा योजना जीर्ण

शहराला पाणीपुरवठा करणारी योजना अत्यंत जीर्ण झाल्यामुळे महापालिकेचा देखभाल, दुरुस्तीचा खर्च सातत्याने वाढत आहे वीजेचेही कोट्यवधी रुपयांचे बिल भरावे लागते. उत्पन्न् आणि खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासोबत सामान्यांना मुबलक पाण पुरवठा कसा करावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे.

इतर बातम्या-

cm uddhav thackeray: तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

Weather Update: सूर्य आग ओकतोय, 121 वर्षात जे घडलं नाही ते यंदाच्या मार्चमध्ये अनुभवयाला मिळाले

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.