AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात.

Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेसमोर आंदोलन
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 02, 2022 | 10:57 AM
Share

औरंगाबाद | नाशिक, पुण्यासारख्या शहरात रोज पाणीपुरवठा (Water Supply) होऊनदेखील तेथे 1500 रुपये पाणीपट्टी आहे. मग औरंगाबादला (Aurangabad) आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना 4,500 रुपये पाणीपट्टी का, असा सवाल औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) कार्यकर्त्यांनी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले. शहरात दहा दिवसाआड पाणी येते. तेदेखील गढूळ आहे. त्यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. काहींचा तर मृत्यूही झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे शुद्ध आणि नियमित पाणी नसेल तर पाणीपट्टीही मिळणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.

प्रशासकांनी ऐनवेळी गैरहजर

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. मात्र वेळ देऊनही पांडेय हे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी मनपातच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. मनपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासकांनी सदर निवेदन स्वीकारण्याचा निरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता. तसेच त्यांनी व्हॉट्सअपद्वारे निवेदन मागवून घेतल्याचेही सांगण्यात आले.

पाणीपुरवठ्यावर खर्च 140 कोटी, उत्पन्न 36 कोटी

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र महापालिकेला या पाणीपुरवठा योजनेसाठी वर्षाला तब्बल 140 कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असून पाणीपट्टीपोटी महापालिकेला यंदा केवळ 36 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात 100 कोटींपेक्षा जास्त तोटा आहे.

पाणीपुरवठा योजना जीर्ण

शहराला पाणीपुरवठा करणारी योजना अत्यंत जीर्ण झाल्यामुळे महापालिकेचा देखभाल, दुरुस्तीचा खर्च सातत्याने वाढत आहे वीजेचेही कोट्यवधी रुपयांचे बिल भरावे लागते. उत्पन्न् आणि खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासोबत सामान्यांना मुबलक पाण पुरवठा कसा करावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे.

इतर बातम्या-

cm uddhav thackeray: तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

Weather Update: सूर्य आग ओकतोय, 121 वर्षात जे घडलं नाही ते यंदाच्या मार्चमध्ये अनुभवयाला मिळाले

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका