Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात.

Aurangabad | आठ दिवसानंतर पाणी तरीही 4,500 रुपये पाणीपट्टी का? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेसमोर आंदोलन
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 10:57 AM

औरंगाबाद | नाशिक, पुण्यासारख्या शहरात रोज पाणीपुरवठा (Water Supply) होऊनदेखील तेथे 1500 रुपये पाणीपट्टी आहे. मग औरंगाबादला (Aurangabad) आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना 4,500 रुपये पाणीपट्टी का, असा सवाल औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) कार्यकर्त्यांनी मनपासमोर ठिय्या आंदोलन केले. शहरात दहा दिवसाआड पाणी येते. तेदेखील गढूळ आहे. त्यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. काहींचा तर मृत्यूही झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे शुद्ध आणि नियमित पाणी नसेल तर पाणीपट्टीही मिळणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.

प्रशासकांनी ऐनवेळी गैरहजर

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. मात्र वेळ देऊनही पांडेय हे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी मनपातच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. मनपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. मात्र प्रशासकांनी सदर निवेदन स्वीकारण्याचा निरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता. तसेच त्यांनी व्हॉट्सअपद्वारे निवेदन मागवून घेतल्याचेही सांगण्यात आले.

पाणीपुरवठ्यावर खर्च 140 कोटी, उत्पन्न 36 कोटी

जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असूनही औरंगाबादमधील बहुतांश भागात चार ते पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. या प्रकारामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र महापालिकेला या पाणीपुरवठा योजनेसाठी वर्षाला तब्बल 140 कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असून पाणीपट्टीपोटी महापालिकेला यंदा केवळ 36 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात 100 कोटींपेक्षा जास्त तोटा आहे.

पाणीपुरवठा योजना जीर्ण

शहराला पाणीपुरवठा करणारी योजना अत्यंत जीर्ण झाल्यामुळे महापालिकेचा देखभाल, दुरुस्तीचा खर्च सातत्याने वाढत आहे वीजेचेही कोट्यवधी रुपयांचे बिल भरावे लागते. उत्पन्न् आणि खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासोबत सामान्यांना मुबलक पाण पुरवठा कसा करावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे.

इतर बातम्या-

cm uddhav thackeray: तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

Weather Update: सूर्य आग ओकतोय, 121 वर्षात जे घडलं नाही ते यंदाच्या मार्चमध्ये अनुभवयाला मिळाले

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.