AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | ठाकरे सरकारची कृपा, औरंगाबादेत निम्मीच पाणीपट्टी, सोमवारपासून अंमलबजावणी!

महाविकास आघाडी सरकारने पाणीपट्टी 4050 वरून 2000 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने ठराव मंजूर केला. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार अशल्याचं उपायुक्त अपार्णा थेटे यांनी सांगितलं.

Aurangabad | ठाकरे सरकारची कृपा, औरंगाबादेत निम्मीच पाणीपट्टी, सोमवारपासून अंमलबजावणी!
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 02, 2022 | 4:13 PM
Share

औरंगाबादः औरंगाबादेतील रहिवाशांना येत्या सोमवारपासून 2 हजार रुपये एवढीच पाणीपट्टी भरावी लागणार आहे. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी असूनही 8 दिवसाआड पाणी मिळणाऱ्या औरंगाबादकरांना ठाकरे सरकारने (Thackeray Government) दिलासा म्हणून हा निर्णय घेतला होता. शहरातील नवी पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत येथील 4050 रुपये असलेली पाणी पट्टी निम्मीच भरा, असे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सांगितले होते. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी यासंदर्भातील ठराव नुकताच मंजूर केला. येत्या सोमवारपासून म्हणजेच 04 जुलैपासून या आदेशाची अंमलबजावणी होतेय. जून महिन्यात राज्यातील ठाकरे सरकारला पायउतार व्हावं लागलं. मात्र याआधी भाजपनं औरंगाबादेत पाणी प्रश्नावरून (water issue) रान उठवलं. भर उन्हाळ्यात आठ दिवसांनी पाणीपुरवठा, त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्यानं पाण्याचं वेळापत्रक कोलमडून जात होतं. परिणामी सामान्य औरंगाबादकरांमध्ये प्रचंड रोष होता. भाजपनेही औरंगाबादकरांचा प्रश्न उचलून धरत जलाक्रोश मोर्चा काढला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही औरंगाबादमधील पाणी प्रश्नात लक्ष घालून काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पाणीपट्टीचा निर्णयही त्यातलाच एक.

4 जुलैपासून अंमलबजावणी

महाविकास आघाडी सरकारने पाणीपट्टी 4050 वरून 2000 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने ठराव मंजूर केला. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार अशल्याचं उपायुक्त अपार्णा थेटे यांनी सांगितलं. शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्ता, जिल्हाधिकारी व महापालिकेतर्फे विविध निर्णय घेण्यात येत आहेत. ज्या वसाहतींना पूर्वी आठव्या, नवव्या दिवशी पाणी येत होते. त्यांना आथा पाच दिवसाआढ पाणी देण्यात येते. त्यात आणखी सुधारणा करण्यात येत आहेत. महापालिका आय़ुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सिडको प्रशासकपदी बदली झाली आहे. तत्पूर्वी त्यांनी पाणीपट्टी कपातीचा ठरावही मंजूर केला.

सर्व वॉर्ड कार्यालयांना पत्र

04 जुलैपासून पाणीपट्टी निम्मी केल्यासंबंधीचे पत्र सर्व वॉर्ड कार्यालयांना पाठवण्यात आल्याची माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली. महापालिकेने यावर्षीपासून मालमत्ता कर आणि पाणी पट्टी एकाच मागणीपत्राच्या माध्यमातून (डिमांड नोट) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यात जुने म्हणजेच 4050 रुपये एवढी पाणीपट्टीची नोंद होती. या सॉफ्टवेअरमध्ये आता 2 हजार रुपये असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून नागरिकांना दोन हजार रुपये पाणीपट्टी भरता येईल.

महापालिकेत मोठ्या प्रमाणावर पदोन्नती

महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे आता सिडको प्रशासक पदी रुजू होती. तत्पूर्वी त्यांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिली. या निर्णयामुळे तब्बल 211 कर्मचाऱ्यांना बढती मिळाली. शुक्रवारी झालेल्या आस्थापना निवड समिती बैठकीमध्ये मनपामध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच चतुर्थ श्रेणी मधील कर्मचाऱ्यांची तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये उपअभियंता, सहाय्यक आयुक्त, कार्यालय आधिक्षक, लिपिक टंकलेखक लेखक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी या संवर्गामधील विविध रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा