दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात गोंधळ

| Updated on: Aug 27, 2021 | 4:43 PM

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातील स्थानकावर एक सामान्य बस उभी होती. या बसमध्ये काही प्रवासी बसलेले होते. तेवढ्यात तिथे दुसरी शिवशाही बस आली. त्यानंतर शिवशाही बस भरण्यासाठी सामान्य बसमधील प्रवाशांना उतरवण्यात आले. नंतर याच प्रवाशांना शिवशाही बसमध्ये बसण्यात आले. याच कारणामुळे सामान्य बस आणि शिवशाही बसमधील कर्मचाऱी यांच्यात वाद पेटला.

दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात गोंधळ
Auranagabad-City-Bus
Follow us on

औरंगाबाद : बसमध्ये जास्तीत जास्त प्रवासी बसावेत तसेच जास्तीत जास्त भाडे मिळावे यासाठी शिवशाही आणि सामान्य बस कर्मचाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला. हा प्रकार औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर घडला. यावेळी दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्यामुळे प्रवासी बराच वेळी ताटकळत उभे होते. (clash between Shivshahi and normal bus driver in Aurangabad)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातील बसस्थानकावर एक सामान्य बस उभी होती. या बसमध्ये काही प्रवासी बसलेले होते. तेवढ्यात तिथे दुसरी शिवशाही बस आली. त्यानंतर शिवशाही बस भरण्यासाठी सामान्य बसमधील प्रवाशांना उतरवण्यात आले. नंतर याच प्रवाशांना शिवशाही बसमध्ये बसण्यास सांगितले गेले. याच कारणामुळे सामान्य बस आणि शिवशाही बसमधील कर्मचाऱी यांच्यात वाद पेटला. हा वाद नंतर विकोपाला गेला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर अक्षरश: गोंधळ घातला.

प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले 

कर्मचाऱ्यांच्या या भांडणामुळे मध्यवर्ती बसस्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा यासाठी मध्यस्थी करावी लागली. मात्र, या सर्व भांडणामध्ये बराच वेळ प्रवाशी ताटकळत बसले होते. घडलेल्या या प्रकाराची सध्या शहरात एकच चर्चा सुरु आहे.

आयकर विभागाचा धाक दाखवून मागितली 60 लाख रुपयांची खंडणी

दरम्यान, औरंगाबादेत उद्योजकांना धमकावण्याचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सध्या एका उद्योजकाला आयकर विभागाचा धाक दाखवून 60 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. भामट्यांनी खंडणी मागताच उद्योजकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली असून सुशांत दत्तात्रय गिरी असे तक्रारदार उद्योजकाचे नाव आहे. या घटनेमुळे औरंगाबादेतील उद्योजक जगतात एकच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या

आता खासगी क्षेत्रातही आरक्षण ? लवकरच शासनाकडे अहवाल सादर करणार, प्रणिती शिंदेंची माहिती

कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, औरंगाबाद विद्यापीठ अनाथ विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारणार

(clash between Shivshahi and normal bus driver in Aurangabad)