AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नरेंद्र मोदी यांची देशातून हवा संपत चालली”; मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपले छेडले

मुंबईमध्ये नरेंद्र मोदी जे काही उद्घाटन करणार आहेत. ती सगळी कामं उद्धव ठाकरे यांनी केलेली आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना कुठलंही यश येणार नाही असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी यांची देशातून हवा संपत चालली; मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपले छेडले
| Edited By: | Updated on: Jan 19, 2023 | 5:08 PM
Share

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे, मात्र त्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. मुंबईमधील विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होत असले तरी विकासकामावरून आता ठाकरे गट, काँग्रेसने श्रेयवादाचे राजकारणावरूनही जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या या मुंबई दौऱ्यानिमित्ताने ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही जहरी टीका केली आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशातून हवा संपत चालली असल्याचा हल्लाबोल करण्यात आला आहे.

हैदराबादमध्ये झालेल्या सभेत पाच मुख्यमंत्री आणि अनेक पक्ष सहभागी झाले होते. त्यामुळे 2024 ला नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय फटका बसणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधानांचा मुंबई दौरा हा ठरवून काढलेला दौरा आहे. कारण आगामी काळात मुंबई महानगरपालिकच्या निवडणुका असल्या कारणाने मतदार भुलवण्यासाठीच नरेंद्र मोदी मुंबईत आले असल्याची टीकाही चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून केले जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना कोणतेही यश येणार नाही अशा स्वरूपाची प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये नरेंद्र मोदी जे काही उद्घाटन करणार आहेत. ती सगळी कामं उद्धव ठाकरे यांनी केलेली आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना कुठलंही यश येणार नाही असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.