AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election: महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतील गटांचीही संख्या वाढणार, वाच काय होणार बदल?

औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकांचीही तयारी सुरु आहे. जिल्हा परिषदेतदेखील वाढीव लोकसंख्येनुसार गट आणि गणांची संख्या वाढणार आहे.

Election: महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतील गटांचीही संख्या वाढणार, वाच काय होणार बदल?
election
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 7:29 AM
Share

औरंगाबादः सध्याच्या वाढीव लोकसंख्येनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. नवीन धोरणानुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेत (ZP election) 8 गट, 16 गणांची वाढ निश्चित केली आहे. त्यामुळे आता 62 ऐवजी 70 गट असतील. तसेच प्रत्येक गटाची लोकसंख्या 35 हजार 703 एवढी असेल.

जिल्हा परिषदांची मुदत तीन महिन्यांत संपणार

औरंगाबाद महापालिकेची मुदत संपून जवळपास वर्ष होत आहे. तसेच जिल्हा परिषदांचीही मुदत तीन महिन्यात संपत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या निवडणुकांची तयारी सुरु आहे. मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. त्यामुळे जनगणना झाली नाही, त्यामुळे प्रभाग, गट, गण आदींची लोकसंख्या , मतदार किती असतील असा प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने वाढील लोकसंख्येचा अंदाज घेऊन निवडणूका घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतील गटांचीही संख्या वाढवणार.

गट आणि गणांमध्ये किती वाढ?

याआधीच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 62 झाली होतकी. तर गणांची संख्या 124 एवढी होती. आता यामध्ये 8 गट आणि 16 गणांची वाढ झाली आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेत 62 ऐवजी 70 गट असतील तर 124 ऐवजी आता 140 असतील. परिणामी यंदा जिल्ह्यात 8 वाढीव जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीचे सदस्य निवडले जातील. सध्या वाढीव लोकसंख्येनुसार एका गटात 35 हजार 703 एवढी लोकसंख्या असेल .

लवकरच आराखडा पाठवणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेतील वाढीव गट, गणांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लवकरच जिल्हा निवडणूक विभागाकडून सर्कल आणि गणांची माहिती संकलित करून त्याचा आराखडा शासनाकडे पाठवला जाईल. त्यानंतर आरक्षित असलेल्या जागांचा ड्रॉ होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

Farmers Protest Called off : दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित, 15 जानेवारीला पुन्हा बैठक

कल्याण-दिवा येथे रस्ते अपघातात तरुण ठार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मनसे आमदाराची मागणी

 

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.