AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election: महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतील गटांचीही संख्या वाढणार, वाच काय होणार बदल?

औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकांचीही तयारी सुरु आहे. जिल्हा परिषदेतदेखील वाढीव लोकसंख्येनुसार गट आणि गणांची संख्या वाढणार आहे.

Election: महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतील गटांचीही संख्या वाढणार, वाच काय होणार बदल?
election
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 7:29 AM
Share

औरंगाबादः सध्याच्या वाढीव लोकसंख्येनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. नवीन धोरणानुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेत (ZP election) 8 गट, 16 गणांची वाढ निश्चित केली आहे. त्यामुळे आता 62 ऐवजी 70 गट असतील. तसेच प्रत्येक गटाची लोकसंख्या 35 हजार 703 एवढी असेल.

जिल्हा परिषदांची मुदत तीन महिन्यांत संपणार

औरंगाबाद महापालिकेची मुदत संपून जवळपास वर्ष होत आहे. तसेच जिल्हा परिषदांचीही मुदत तीन महिन्यात संपत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या निवडणुकांची तयारी सुरु आहे. मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. त्यामुळे जनगणना झाली नाही, त्यामुळे प्रभाग, गट, गण आदींची लोकसंख्या , मतदार किती असतील असा प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने वाढील लोकसंख्येचा अंदाज घेऊन निवडणूका घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतील गटांचीही संख्या वाढवणार.

गट आणि गणांमध्ये किती वाढ?

याआधीच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 62 झाली होतकी. तर गणांची संख्या 124 एवढी होती. आता यामध्ये 8 गट आणि 16 गणांची वाढ झाली आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेत 62 ऐवजी 70 गट असतील तर 124 ऐवजी आता 140 असतील. परिणामी यंदा जिल्ह्यात 8 वाढीव जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीचे सदस्य निवडले जातील. सध्या वाढीव लोकसंख्येनुसार एका गटात 35 हजार 703 एवढी लोकसंख्या असेल .

लवकरच आराखडा पाठवणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्हा परिषदेतील वाढीव गट, गणांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लवकरच जिल्हा निवडणूक विभागाकडून सर्कल आणि गणांची माहिती संकलित करून त्याचा आराखडा शासनाकडे पाठवला जाईल. त्यानंतर आरक्षित असलेल्या जागांचा ड्रॉ होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

Farmers Protest Called off : दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित, 15 जानेवारीला पुन्हा बैठक

कल्याण-दिवा येथे रस्ते अपघातात तरुण ठार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मनसे आमदाराची मागणी

 

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.