AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला दिलासा दिला असता तर एवढं रामायण घडलंच नसतं, संजय शिरसाट यांचा आठवणींना उजाळा

पण, 15 मिनिटांत पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखं आश्चर्य नाही.

आम्हाला दिलासा दिला असता तर एवढं रामायण घडलंच नसतं, संजय शिरसाट यांचा आठवणींना उजाळा
संजय शिरसाट यांचा आठवणींना उजाळाImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 23, 2022 | 10:43 PM
Share

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौरा केला. यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, आयुष्यामध्ये अशी संकटं येत असतात. माझ्यावरही संकट आलं होतं. पण, आजारपणाच्या काळात मी एक पाहिलं. आपण जर चांगली काम केलीत, तर लोकं आपल्यासोबत असतात. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. अनेकांचे फोन आले. अनेकांच्या शुभेच्छा आल्या. मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्ता भेटायला आला होता. हिम्मत हारायची नसते. एकदा जे काही संकट असतात. त्याला सामोरे जावं लागतं. कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळं मी ठणठणीत होऊन त्यांच्या सेवेत रुजू झालो.

आजार हा आजार असतो. दुसरं काही कुणी समजत असेल तर तो बालीशपणा म्हणावा लागेल. मी आज बातमी पाहिली. उद्धव ठाकरे आले. पंधरा मिनिटांचा दौरा केला.सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या घरी चहा पिण्यास गेल्यास किमान वीस मिनिटं लागतात. पण, 15 मिनिटांत पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखं आश्चर्य नाही.

पण, एक गोष्ट खटकली. विरोधी पक्षनेते या शहराचे आहेत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांना बोलायला नको होतं. त्यांना बोलावून का बोलायला लावलं हा माझा प्रश्न असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.

आपल्याकडं कंत्राटी बेसवर आलेले काही कार्यकर्ते आहेत ना. आजकाल भाषण करतात. त्यांना दौरा करायला लावायचा. त्यांनी भाषण करायचे आणि आम्ही टाळ्या वाजवायचे. यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही.

उद्धव ठाकरे यांना त्रास होतो. शरद पवार यांनी म्हंटलं की, उद्धव ठाकरे यांना त्रास होऊ नये. नवीन लोकांना कळू द्या. शिवसैनिकांची मेहनत काय असते, असा टोला त्यांनी सुषमा अंधारे यांना नाव न घेता लगावला.

उद्धव ठाकरे आले. त्यांचे स्वागत आहे. पण, येऊन दिलासा न देता जाणं हे काही बरोबर नाही. आम्हाला दिलासा दिला असता तर येवढं रामायण घडलंच नसतं,असा टोलाही संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.