AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मंत्र्याच्या फोटोमुळं आनंदाचा शिधा उशिरा मिळाल्याचा विरोधकांचा आरोप

विरोधकांच्या मतानुसार शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यामुळं हा शिधा उशिरा पोहचला.

या मंत्र्याच्या फोटोमुळं आनंदाचा शिधा उशिरा मिळाल्याचा विरोधकांचा आरोप
फोटो छापणारे एकमेव मंत्री कोण? Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 23, 2022 | 10:09 PM
Share

औरंगाबाद : संदीपान भु्मरे हे आनंदाच्या शिधा पाकिटावर फोटो छापणारे पहिले मंत्री ठरलेत. मात्र, त्यांच्या या फोटो छपाईच्या कामामुळं पैठणवासीयांना चार दिवस उशिरानं शिधा मिळाल्याचा आरोप होतोय. दिवाळीनिमित्त सरकारनं वाटलेला आनंदाचा शिधा उशिरानं पोहचल्याचा आरोप झाला. अचानक इतकी मोठी आर्डर तयार करून पोहचविण्यासाठी विलंब सहाजिक आहे. मात्र, औरंगाबादच्या पैठणमध्ये या शिध्याची पाकीटं तयार असूनही चार दिवस उशिरानं मिळाली. या विलंबाचं कारणही वेगळं आहे.

विरोधकांच्या मतानुसार शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यामुळं हा शिधा उशिरा पोहचला. यामागचं कारण आहे या शिधाच्या पाकिटावर दिसणारा संदीपान भुमरे यांचा फोटा. संदीपान भुमरे यांनी राज्य सरकारच्या आनंदाच्या शिधावर स्वतःचे फोटो छापले. त्यामुळं सामान्य लोकांना पैठणमध्ये शिधा उशिरा मिळाल्याचा आरोप होतोय.

फोटो छापून होईपर्यंत शिधा न वाटण्याचे आदेश मंत्री संदीपान भुमरे यांनी वितरकांना दिले होते. त्यातच चार दिवस गेल्याचा दावा केला जातोय. महाराष्ट्र सरकारनं दिवाळीनिमित्त दिलेल्या या शिधावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. या तिन्ही नेत्यांच्या फोटोखाली महाराष्ट्र शासनाचं चिन्ह आहे. त्याच्या दोन्ही बाजूला एक रिकामी जागा होती. त्याच रिकाम्या जागेवर मंत्री संदीपान भुमरे यांनी स्वतःचा फोटो छापला.

तीन फोटोंएवजी चौथा फोटो म्हणजे संदीपान भुमरे यांचा आहे. आनंदाच्या शिधा येथे फोटो छापणारे संदीपान भुमरे हे एकमेव मंत्री आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही त्यावर स्वतःचा फोटो छापलेला नाही.

सामान्य लोकांची दिवाळी गोड जावी म्हणून राज्य सरकारनं शिधा देण्याचं ठरविलं. त्याला आनंदाचा शिधा असं नाव देण्यात आलं. शंभर रुपये देऊन लोकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो गोडतेल, एक किलो चणाडाळ अशा चार वस्तू मिळत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.