AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur | बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेलेल्या 5 माऊली बुडाल्या, लातूरात हळहळ, मुलगा तेवढा वाचला!

महिला बुडत असल्याचे पाहिल्यानंतर तलावावरील इतरांनी गावकऱ्यांना ही बातमी दिली. त्यानंतर गावकरी त्यांना वाचवण्यासाठी पोहोचले. मात्र या घटनेत फक्त मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले. अखेर पाचही महिलांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले.

Latur | बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेलेल्या 5 माऊली बुडाल्या, लातूरात हळहळ, मुलगा तेवढा वाचला!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 3:42 PM
Share

लातूरः लातूरमध्ये (Latur mishap) एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. साठवण तलावात एक मुलगा बुडू लागला. हे पाहून त्या मुलाला वाचवण्यासाठी तलावाशेजारी उभी असलेली एक महिला गेली. त्यानंतर तलावाच्या (Lake) किनाऱ्यारील इतरही महिलांनी त्यांची मदत करण्यासाठी पाण्यात प्रवेश केला. मात्र मुलाला वाचवताना आपलेही प्राण वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न महिलांनी केले. मात्र पाण्याचा प्रवाह आणि तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यानं या पाचही माऊली तलावात बुडाल्या (women drowned). इतर नागरिकांच्या मदतीने मुलाला वाचवण्यात यश आलं, मात्र या पाचही माऊलींना वाचवता आलं नाही. एकाच वेळी पाच महिलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुठे घडली घटना?

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील उजना गावच्या परिसरातील साठवण तलावात ही घटना घडली. सकाळी 10 वाजताची ही घटना आहे. विशेष म्हणजे या पाचही महिला ऊसतोड कामगार होत्या. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील तुळशीराम तांडा येथील त्या रहिवासी आहेत. कामानिमित्त त्या या भागात आल्या होत्या. मात्र बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात या पाचही महिलांचा करुण मृत्यू झाला.

मृत महिलांची नावं-

– राधाबाई आडे -(वय-45), – सुषमा राठोड-(वय-21), – काजल आडे-(वय-19), – दिक्षा आडे-(वय-22), – अरुणा राठोडा (वय-25)

माऊली गेल्या, मुलगा वाचला

महिला बुडत असल्याचे पाहिल्यानंतर तलावावरील इतरांनी गावकऱ्यांना ही बातमी दिली. त्यानंतर गावकरी त्यांना वाचवण्यासाठी पोहोचले. मात्र या घटनेत फक्त मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले. अखेर पाचही महिलांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले.

Follow Us
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.