AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट म्हणून घोषित

जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीतील कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यांकन करून हा मान औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस दलाला देण्यात आला आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट म्हणून घोषित
Mokshada Patil
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 9:01 PM
Share

औरंगाबाद: महाराष्ट्र पोलीस महासंचलनालय (Maharashtra police) यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा मान औरंगाबादच्या ग्रामीण जिल्हा पोलीस दलाला मिळाला आहे. जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीतील कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यांकन करून हा मान औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस दलाला देण्यात आला आहे. या काळात ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील(Mokshada Patil)  यांच्या नेतृत्वात औरंगाबाद ग्रामीण युनिटचे काम चालले. नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल मोक्षदा पाटील मॅडम आणि संपूर्ण ग्रामीण पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तीन श्रेणींमध्ये पोलीस दलांचे विभाजन

राज्य पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता, कामगिरी, गुन्हेगारीला आळा, गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे इत्यादी मापदंडांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार सकारात्मक, नकारात्मक मापदंडांच्या आधारे श्रेणी तयार करण्यात येतात. राज्यातील घटक कार्यालयांची जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत A,B,C अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. त्यानुसार A श्रेणीत 24 घटक कार्यालये तर B श्रेणीत 24 घटक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. या विविध श्रेणींतून मूल्यांकन समितीद्वारे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची प्रथम क्रमांकावर निवड केली आहे. या कार्यकाळात ग्रामीण पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या निवडीचे श्रेय जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले असून त्यांचेही कौतुक केले.

औरंगाबाद पोलीस दलातील नवे बदल

दरम्यान, गृहविभागामार्फत झालेल्या नव्या बदल्यांनुसार, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलिस अधीक्षक पदावर मुंबई येथील पोलीस उपायुक्त निमित गोयल यांची बदली करण्यात आली आहे. तर मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलिस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे. तसेच राज्यीतल पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. यात औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयातील मीना मकवाना आणि निकेश खाटमोडे पाटील यांचीही बदली करण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या जागी उज्ज्वला वनकर आणि अपर्णा सुधाकर गिते यांची नियुक्ती करण्यात आली.

इतर बातम्या- 

औरंगाबाद पोलिस दलात दिसणार ‘महिलाराज’, नव्या बदल्यांनुसार पाच प्रमुख पदावर महिला पोलिस अधिकारी

अखेर ‘त्या’ रिक्षाचालकाच्या मुसक्य़ा आवळल्या, चालत्या रिक्षात तरुणीला छेडणं महागात

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.