AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : आत काही तरी शिजतंय? मुख्यमंत्र्यांना कोण आडवतंय?; मनोज जरांगे पाटील यांचा सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मी उपोषण करणारच आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण आमच्याही लेकराबाळांचा प्रश्न आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : आत काही तरी शिजतंय? मुख्यमंत्र्यांना कोण आडवतंय?; मनोज जरांगे पाटील यांचा सवाल
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2023 | 10:18 AM
Share

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 25 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी आपण आमरण उपोषणावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली त्याचा आम्ही आदर करतो. त्यांचा सन्मान करतो. पण आमच्याही लेकराबाळांचा प्रश्न आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय? आत काय शिजतंय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळी जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यावर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी शपथ घेतली. आम्ही त्यांचा सन्मान करतो. तोंडापुरतं बोलत नाही. ते चांगले आहेत. त्यांना कोण आरक्षण देण्यापासून आडवतंय हे आम्हाला शोधावं लागेल. आज दिवस भर शोधावे लागले. आमच्या अशाच पिढ्या जाणार का शोधायला? त्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला तर ते पाळतात हे त्यांची ख्याती आहे. त्यांनी शपथ घेतली. त्याचं कौतुक आहे. आदर आहे. पण आमच्या लेकराबाळांचाही प्रश्न आहे. त्यामुळे थांबणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

त्यांना आरक्षण कसं दिलं?

जे टिकणारच नाही ते आरक्षण दिल्यावर ते उच्च न्यायालयात टिकणारच नाही. बाकीच्या लोकांना कशातून आरक्षण दिलं? त्या निकषात मराठे बसत नाही का? मग काय अडचण आहे? कशाला वारंवार तुम्ही कारण का सांगता? माळी समाजाचा व्यवसाय काय? विदर्भातील कुणबी समाजाचा व्यवसाय काय? त्यांना आरक्षण दिलं, ते कसं दिलं? त्यांनी किती कागदपत्र दिली? त्यांना आरक्षण देण्यासाठी तुम्ही किती समित्या नेमल्या? असे सवालच जरांगे पाटील यांनी उपस्थित केले.

काही तरी शिजतंय

आम्ही आरक्षण देण्यासाठी 40 दिवस दिले होते. आज 41 वा दिवस आहे. काहीच निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? कारण काय आहे? त्याचा शोध घेतला पाहिजे. अडचण असल्याशिवाय, मुख्यमंत्र्यांची तळमळ पाहता काही तरी गडबड आहे. काही तरी आत शिजतंय. नाही तर त्यांनी शपथ घेतली नसती. 40 दिवस घेतले नसते. विरोध करणारे कोणी तरी आत आहे. आम्ही शोधलेतही, असा दावा त्यांनी केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.