कुणबी प्रमाणपत्रांपासून ते सातारा गॅझेटपर्यंत… काय काय मान्य? काय ठरलं? अखेर जरांगेंच्या उपोषणाची सांगता

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुकारलेले उपोषण अखेर संपुष्टात आले आहे. शासनाने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, कुणबी प्रमाणपत्र, सातारा गॅझेटियर लागू करणे, तसेच दाखल गुन्हे मागे घेण्यावर सहमती दर्शवली आहे.

कुणबी प्रमाणपत्रांपासून ते सातारा गॅझेटपर्यंत... काय काय मान्य? काय ठरलं? अखेर जरांगेंच्या उपोषणाची सांगता
Image Credit source: manoj jarange
| Updated on: May 31, 2026 | 1:24 AM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या विविध मागण्यांवर अखेर मार्ग निघाला आहे. जरांगे यांच्या सर्व मागण्यांची येत्या 2 ते 3 दिवसात मान्य करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. जरांगे यांनीही विखे पाटलांच्या शब्दाचा मान ठेवून उपोषण सोडलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी शिष्टाई केल्याने हे उपोषण अखेर सुटलं. उपोषण सोडण्यापूर्वी काय काय मागण्या मान्य झाल्या? कोणत्या मागण्यांसाठी किती वेळ देण्यात आला? याचाच घेतलेला हा आढावा.

काय काय ठरलं?

>> 58 लाख नोदी सापडलत त्याचा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार. दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलेडीटी द्या, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून 15 दिवसाला आढावा घेणार. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जाणार.

>> मराठा आणि कुणबी याला स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा. मंत्रालयासाठी मी महिनाभर थांबणार नाही, OBC ना मंत्रालय आहे आपल्याला का नाही?

>> कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांना व्हॅलिडिटी दिली पाहिजे. व्हॅलिडिटीला अडचण आली तर विखे पाटील यांच्याकडून एक हेल्पलाईन नंबर जाहीर

>> सातारा गॅझेटीयर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला.

>> खोटे गुन्हे दाखल केले आहेत काही पुरावे नाहीत. आमच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यायचे नसेल तर आमच्याही पोलिसांच्या विरोधात तक्रारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.

>> NCRT चा मराठा साम्राज्याचा नकाशा करून घ्या केंद्रात जा कुठेही जा तो उडवला आहे.

विखे पाटील काय म्हणाले?

सर्व मागण्या मान्य झाल्यावर विखे पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मुंबईच्या आंदोलनानंतर अनेक निर्णय झाले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र अजूनही काही निर्णयाबाबत शंका होते. त्यासाठी त्यांनी आज पुन्हा आंदोलन सुरू केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यापुढे सुद्धा समाज बांधवांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले. या आंदोलनातही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. जरांगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, त्यामुळे समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो आहे, त्यांच सुद्धा मी अभिनंदन करतो, असं विखे पाटील म्हणाले.

आजच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यावर आम्ही दोन-तीन दिवसात शासन निर्णय काढून अंमलबजावणी सुरू करत आहे. आम्ही जो प्रस्ताव मांडला, त्याला जरांगे पाटील आणि अभ्यासकांनी मान्यता दिली. त्यांचं अभिनंदन करतो. जरांगे पाटलांनी सुरु केलेलं उपोषण स्थगित करावं असं मी त्यांना आवाहन करतो, असंही ते म्हणाले.

जरांगे काय म्हणाले?

यावेळी मनोज जरांगे पाटीलही आंदोलकांशी संवाद साधला. शिष्टमंडळाचं म्हणणं आहे दोन-तीन दिवसात जीआर काढतो. जीआर काढला नाही तर पुन्हा उपोषण सुरू करतो. सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हो म्हटल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. आता उपोषण सोडायचं का? तुम्ही जर नाही म्हणत असाल तर मी मंडपात उपोषण सुरू करतो. उन्हातलं बंद करू, असं जरांगे म्हणाले. तेव्हा सर्वांनी एकमुखाने उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं.

Follow Us