AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले, मजारीवर चादर चढवली, पाहा EXCLUSIVE VIDEO

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या कृतीवर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले, मजारीवर चादर चढवली, पाहा EXCLUSIVE VIDEO
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 17, 2023 | 5:54 PM
Share

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात याचा अंदाज बांधणं सध्याच्या घडीला कठीण झालं आहे. कारण घडामोडीच तशा घडू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली आहेत. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यामुळे त्यांच्या या कृतीवरुन आता वेगवेगळ्या चर्चा होऊ शकतात.

विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबच्या मजारीला भेटीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या मजारीला वाकून फुले वाहताना दिसत आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीवर चादर देखील चढवली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय मैत्री केली आहे. ठाकरे गटाची याबाबत असलेली भूमिका सर्वश्रूत आहे.

असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीवर फुले वाहिली आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीमुळे ठाकरे गट देखील राजकीय कोंडीत अडकू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ठाकरे गटाकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

‘औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय?’

“औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचं राज्य का आलं? तर बाबासाहेबांनी सरळ सांगितलंय की, जयचंद इथे आले आणि साऱ्या राज्या-राज्यात झाले. त्या जयचंदाना शिव्या घालाना, त्या औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संबंधित प्रश्न उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकर यांचा शिंदे-फडणवीसांना टोला

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट स्टेटसला ठेवली म्हणून वाद निर्माण झाला होता. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी “माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय होऊ देता म्हणून होतो”, अशी प्रतिक्रिया दिली.

Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....