AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | प्रकाश आंबेडकर यांच्याकडून औरंगजेबाच्या समाधीला भेट, औरंगाबादमधील मोठी घटना

प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना या कृतीतून नेमका काय मेसेज द्यायचाय ते मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

BIG BREAKING | प्रकाश आंबेडकर यांच्याकडून औरंगजेबाच्या समाधीला भेट, औरंगाबादमधील मोठी घटना
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 5:25 PM
Share

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा घडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं आहे. असं असताना त्यांनी औरंगाबादला जावून औरंगजेबाच्या समाधीला का भेट दिली? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, यावर प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद येथे औरंगजेबाची समाधी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबादमध्ये दाखल होत औरंगजेबाच्या समाधीला भेट दिलीय. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. या दरम्यान त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

‘औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का?’

“औरंगाबादच्या समाधींना भेट दिली आहे. इथे आणखी एक ऐतिहात्सिक वास्तू आहे. ती वास्तूदेखील बघायला आलेलो आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. “औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचं राज्य का आलं? तर बाबासाहेबांनी सरळ सांगितलंय की, जयचंद इथे आले आणि साऱ्या राज्या-राज्यात झाले. त्या जयचंदाना शिव्या घालाना, त्या औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय?”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

ठाकरे गटाची कोंडी होऊ शकते का? प्रकाश आंबेडकर म्हणतात…

औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने ठाकरे गटाची कोंडी होऊ शकते का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अजिबात नाही, असं उत्तर दिलं. “औरंगाबाद हे दुसरी राजधानी व्हावी हे तुघलकापासून आहे. लोकांचा सेकंड कॅपिटलला विरोध असेल तर माझं म्हणणं आहे, महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. सांगावं की, औरंगाबाद, खुलताबाद हा भाग भारताची दुसरी राजधानी म्हणून जाहीर करावी”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर…’

औरंगजेबाचे व्हिडीओ स्टेटसला ठेवले म्हणून राज्यात वाद निर्माण झाला. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता, “माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर दोन दिवसांत निपटून टाकलं असतं. वादाचा विषय होऊ देता म्हणून होतो”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. प्रकाश आंबेडकर यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले आहेत.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.