AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात, संजय राऊतांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आंदोलन

शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून औरंगाबाद शहरात या मोर्चाचे आयोजन केले जात आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेने शहरात या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती.

औरंगाबादेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात, संजय राऊतांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आंदोलन
संजय राऊत यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 12:38 PM
Share

औरंगाबादः वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या आक्रोश (Shivsena Morcha) मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात हा विशाल मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे (Aurangabad politics) मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात येत आहे. शेकडो शिवसेना कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौकातून गुलमंडीकडे निघाला आहे. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून याकरिता केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

मराठवाड्यात आंदोलनाची ठिणगी- संजय राऊत

संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबदमध्ये शिवसेनेचा मोर्चा काढला. यावेळी संजय राऊत यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, महागाईच्या विरोधात आम्ही चलो दिल्ली अशी हाक दिली आहे. या आंदोलनाचा प्रसार संपूर्ण देशात होणार आहे. मराठवाड्यात फक्त या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. आता हे लोण संपूर्ण देशभर पसरेल. देशातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करण्याच्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. याची सुरुवात औरंगाबादमध्ये होत आहे.

औरंगाबादमध्ये शिवसेना नेत्यांची उपस्थिती

संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भूमरे यांचीही उपस्थिती दिसून आली. यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून औरंगाबाद शहरात या मोर्चाचे आयोजन केले जात आहे. दिवाळीच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेने शहरात या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या आंदोलनावर टीका केली आहे. शिवसेनेची ही भंपकगिरी असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

इतर बातम्या-

ज्या रझा अकादमीवर बंदीची मागणी केली जातेय, त्यांच्या दंगलीमुळे महाराष्ट्राच्या डॅशिंग IPS अधिकाऱ्याचं करिअर उतारणीला लागलं माहिती आहे? वाचा सविस्तर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.