AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद अन् जालना दोन्ही ठिकाणी पीटलाइन, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या आश्वासनानंतर वाद शमणार की चिघळणार?

औरंगाबादमधील चिकलठाण्यात रेल्वेची पीटलाइन होणार असेल तर त्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या जालन्याला पीटलाइन कशी मिळू शकते, हे कसे व्यवहार्य ठरू शकते, असा सवाल रेल्वे संघटनांनी केला आहे.

औरंगाबाद अन् जालना दोन्ही ठिकाणी पीटलाइन, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या आश्वासनानंतर वाद शमणार की चिघळणार?
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 3:00 AM
Share

औरंगाबादः औरंगाबामधील चिकलठाणा येथे होऊ घातलेली रेल्वेची पीटलाइन (Railway pitline) जालन्याला पळवल्याचा आरोप केद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर केला जात होता. डॉ. भागवत कराड यांनी यापूर्वी रेल्वेची पीटलाइन औरंगाबादेत होत असून त्यासाठी चिकलठाणा येथील जागा प्रस्तावित असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर मंत्री दानवे यांच्या जालन्याच्या घोषणेनंतर या दोन जिल्ह्यांमध्ये वाद सुरु झाला होता. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) यांनी दोन्ही जिल्ह्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून दोन्ही ठिकाणी रेल्वेची पीटलाइन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती दिली. बुधवारी औरंगाबादमधील उद्योजकांच्या शिष्टमंडळाला ही माहिती देण्यात आली. मात्र यानंतरही वाद न मिटता आणखी चिघळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिकलठाणा येथे पीटलाइन मंजुर असताना 65 किलोमीटर अंतरावरील जालन्यालाही पीटलाइन कशी मिळू शकते, असा सवाल प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री काय म्हणाले?

उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, विवेक देशपांडे, डॉ. फडके आणि भाजपच्या विजया रहाटकर यांनी बुधवारी दिल्लीत अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी पीटलाइनसह औरंगाबाद- नगर रेल्वे मार्ग, जालना-जळगाव रेल्वे मार्ग, औरंगाबाद-चाळीसगाव मार्ग आदींवर चर्चा झाली. यावेळी रेल्वेची पीटलाइन जालना आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वे पीटलाइनचा नेमका वाद काय?

रेल्वेची पीटलाइन म्हणजे एखाद्या रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे स्वच्छता आणि दुरुस्ती करण्यासाठीचे अधिकचे रुळ. ज्या ठिकाणी पीटलाइन होते, त्याठिकाणी रेल्वे गाड्या जास्त वेळ थांबतात. तसेच अतिरिक्त रेल्वे गाड्या येथून सोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे पीटलाइन झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या विकासाच निश्चित भर पडते. त्यानुसार औरंगाबादला गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाइनची प्रतीक्षा आहे. चिकलठाणा येथे यासाठी जागा प्रस्तावितदेखील करण्यात आली होती. मात्र 2 जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर 100 कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाइन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादसाठी पीटलाइन करण्याची मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लावून धरली. या वादावर पडदा पाडण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दोन्ही ठिकाणी पीटलाइन होईल, असे आश्वासन दिले आहे.

रेल्वे संघटनांचा काय सवाल?

दरम्यान, औरंगाबादमधील मुकुंदवाडी स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात याव्यात या मागणीसाठी अनेक दिवसांपासून रेल्वे संघटना प्रयत्न करत आहेत. मात्र हे करणे व्यवहार्य नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता औरंगाबादमधील चिकलठाण्यात रेल्वेची पीटलाइन होणार असेल तर त्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या जालन्याला पीटलाइन कशी मिळू शकते, हे कसे व्यवहार्य ठरू शकते, असा सवाल रेल्वे संघटनांनी केला आहे. तसेच औरंगाबादच्याच पीटलाइनला प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे संघटनांनी केली आहे.

इतर बातम्या-

Malegaon Hijab Day : कर्नाटकच्या घटनेचे मालेगावात पडसाद, जमेत ए उलमातर्फे ‘हिजाब दिवस’ चे आयोजन

VIDEO: राजभवनात थुई थुई नाचणारे मोर आणि विषारी नागही येतात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.