AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यटन स्थळांनाही 50% क्षमतेचा नियम का नाही ? हजारोंचा उदरनिर्वाह ठप्प, बंदी हटवण्याची अंबादास दानवेंची मागणी!

औरंगाबादः राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पर्यटन स्थळे बंद (Aurangabad tourist places) करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. कोरोना काळात अजिंठा लेणीला तिसऱ्यांदा टाळे लागले असून यामुळे पर्यटन व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शहरातील जिम, मॉल, हॉटेल्सना 50टक्के उपस्थितीची सवलत देत सुरु ठेवले आहे, मात्र पर्यटन […]

पर्यटन स्थळांनाही 50% क्षमतेचा नियम का नाही ? हजारोंचा उदरनिर्वाह ठप्प, बंदी हटवण्याची अंबादास दानवेंची मागणी!
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 11, 2022 | 2:27 PM
Share

औरंगाबादः राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पर्यटन स्थळे बंद (Aurangabad tourist places) करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. कोरोना काळात अजिंठा लेणीला तिसऱ्यांदा टाळे लागले असून यामुळे पर्यटन व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शहरातील जिम, मॉल, हॉटेल्सना 50टक्के उपस्थितीची सवलत देत सुरु ठेवले आहे, मात्र पर्यटन स्थळांना पूर्ण टाळे का ठोकण्यात आले आहे, असा सवाल पर्यटन व्यावसायिक करत आहेत. पर्यटन स्थळांवरही पन्नास टक्क्यांची सवलत देण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे. हॉटेल आणि मॉल्सच्या तुलनेत लेणी परिसरात पुरेसे व्हेंटिलेशन असताना लेणीवरच बंदी का घातली जातेय, असा सवाल केला जात आहे.

अंबादास दानवे यांचे पर्यटन मंत्र्यांना पत्र!

Ambadas Danve letter

आमदार अंबादास दानवे यांचे पर्यटनमंत्र्यांना पत्र

व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांवर ओढवलेल्या या संकटाचा विचार करता, औरंगाबाद शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. हॉटेल आणि मॉल्सप्रमाणे अजिंठा लेणी तसेच इतरही पर्यटन स्थळांवर 50 टक्के नागरिकांची उपस्थिती, असा नियम लागू करून तीदेखील खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती यात करण्यात आली आहे.

पाचशेवर कुटुंबांवर संक्रांत

10 जानेवारी अर्थात सोमवारपासून अजिंठा लेणीचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. फक्त अजिंठा लेणीचा विचार केल्यास या बंदमुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या 73 दुकानदार, 45 डोलीवाहक, 30 रिक्षा व 20 टॅक्सीचालक, 100 फेरीवाले, गाईड, 10 पर्यटक निवासस्थाने, 20 छोटे मोठे हॉटेल्स चालक आदी जवळपास पाचशे लोकांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

दोन वर्षात तिसऱ्यांदा लेणी बंद

मागील दोन वर्षात अजिंठा लेणी तीन वेळा बंद ठेवण्यात आली. 17 मार्च 2020 रोजी पहिल्यांदा अजिंठा लेणीचे दरवाजे बंद करण्यात आले. तब्बल 9 महिने येथे पर्यटकांना येण्यास मज्जाव होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत 12 मार्च 2021 रोजी अजिंठा लेणी दुसऱ्यांदा बंद करण्यात आलीय यावेळी सहा महिने लेणी बंद होती. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असलेली अजिंठा लेणीची यात्राही सलग तिसऱ्या वर्षी रद्द झाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाचा हिरमोड झाला आहे.

इतर बातम्या-

Cotton Production : शेवटी बाकी शून्यच ? कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट

Makar Sankrant 2022 | उत्तरायण म्हणजे काय! भीष्म पितामह यांच्या मृत्यूशी काय आहे याचा संबंध ? जाणून घ्या

Follow Us
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?