AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप म्हणजे विषारी साप! कधीही नाग पाठवू शकतात, दोस्ती नाही, दुश्मनीही नाही; बच्चू कडू यांची खोचक टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता यावर बच्चू कडू यांनी वक्तव्य करत भाजपवर खोचक टीका केली आहे.

भाजप म्हणजे विषारी साप! कधीही नाग पाठवू शकतात, दोस्ती नाही, दुश्मनीही नाही; बच्चू कडू यांची खोचक टीका
bacchu kaduImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 12, 2026 | 12:42 PM
Share

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असताना लँडिंगपूर्वी त्यांच्या विमानात बिघाड झाला. त्यानंतर त्यांच्या विमानाचा स्फोट झाला. या विमान अपघातावर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. दरम्यान, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वक्तव्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजप म्हटलं की संशयावरच पाहते.. त्यांनी खांद्यावर हात टाकलं तरी लोक म्हणतात हा मेला, त्यांच्या खांद्यावर हात टाकला तरी पण.. ती सापासारखी लोक आहेत. भाजप म्हणजे विषारी साप आहे. भाजपसोबत दुश्मनी पण नाही दोस्ती पण नाही. हम तो दुश्मनी कर चुके है.. ते कधीही नाग पाठवू शकतात’ असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, पूर्वी सिविल सर्जनला औषध घेण्याचे अधिकार होते. आता सगळे औषधी घेण्याचे अधिकार ठेवले मंत्रालयात. लावला गेम बरोबर कमिशन खा औषध महाग करा. न खाऊंगा ना खाने दूंगा सबसे ज्यादा देश के अंदर खाने वाला है तो बीजेपी है… टेंडर देण्यासाठी पैसे खाते. एमआरइजीएसचे पैसे अजून भेटले नाही. लाडकी बहिणीचे पैसे महिन्याचे पैसे भेटले नाही. अपंगाचे पगार वेळेवर नाही. ज्याला दोन पाय नाही साले हो त्याचे पगार वेळेवर देत नाही.. तुमच्या कुठं माराव रे… माराची वेळ नाही आली आता.. आम्ही पाहतोय वेळ आली तर मारू कानफटात.

लाडकी बहिण योजनेवर काय म्हणाले?

लाडक्या बहिणीच्या नावानं पंधराशे रुपये टाकून मतं भेटू शकले असणार पण स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तुमचे पैसे किती लुबाडले याची गणित लावावे लागेल. इकडून पैसे दिले आणि मीटरच्या माध्यमातून सरकारन पैसे घेतले. कर्जमाफी भेटली नाही तर महाराष्ट्रात रेल्वेचा चाक धावू देणार नाही. आम्ही गनिमी कावा करू. कामगाराला काढलं तर काय कामगार न्यायालयात जा.. चार चार वर्षे रिझल्ट लागत नाही. कोर्टाचे काय हाल आहेत सर्वांना माहीत आहे. कोर्ट आपल्या बाजूने राहिल का नाही याची भीती वाटते असे बच्चू कडू म्हणाले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.