AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plastic Ban : आजपासून राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी; राज्य सरकारची मोठी घोषणा

प्लास्टिक (Plastic) वापराबाबत नव्या राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्लास्टिक वापराबाबतच्या नव्या धोरणानुसार प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

Plastic Ban : आजपासून राज्यात प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी; राज्य सरकारची मोठी घोषणा
Image Credit source: TIMES OF INDIA
| Updated on: Jul 27, 2022 | 7:45 AM
Share

मुंबई : प्लास्टिक (Plastic) वापराबाबत नव्या राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्लास्टिक वापराबाबतच्या नव्या धोरणानुसार प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, किंवा त्या प्लास्टिक लॅमिनेटेड आहेत. अशा वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी याबाबत घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पर्यावरण (Environment) विभागासोबत एक बैठक झाली होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या सिंगल -यूज प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीने ज्या प्लास्टिक वापराबाबत शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींना मान्यता दिली आहे. नव्या नियमानुसार आता या वस्तूंच्या उत्पादनाला, आयात, निर्यात तसेच वापर यावर पूर्णपणे बंदी असणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडाची तरतुद देखील करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी

सिंगल -यूज प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्यात समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने 18 जुलैरोजी झालेल्या बैठकीत प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, किंवा त्या प्लास्टिक लॅमिनेटेड आहेत. अशा वस्तूंवर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली होती. राज्य सरकारने या समितीची ही शिफारस स्विकारली असून, राज्यात अशा प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर कोणी करत नाहीना, हे पहाण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आता अशा प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांवर धाडी टकाण्यास सुरुवात झाली आहे.

प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान

प्लास्टिकचा समावेश हा अविघटनशिल पदार्थांमध्ये होतो.प्लास्टिकचे विघटन लवकर होत नाही. वर्षानुवर्ष प्लास्टिक तसेच पडून रहाते. सध्या प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढला आहे.प्लास्टिकचा वाढता वापर आणि ते विघटन होत नसल्याने कचऱ्यात वाढ होत आहे. सोबतच याचा मोठा फटका हा पर्यावरणाला देखील बसत आहे. प्राणी रस्त्यावर पडलेले असे प्लास्टिक खातात त्यामुळे त्यांचे आरोग्य देखील धोक्यात येते, या सर्व पार्श्वभूमीवर प्लॉस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.