AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed | बीड जिल्ह्यात अपघात मालिका सुरूच, वांजरा फाट्याजवळ पती पत्नीचा जागीच मृत्यू, तीन दिवसात 12 बळी!

कारमधील अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Beed | बीड जिल्ह्यात अपघात मालिका सुरूच, वांजरा फाट्याजवळ पती पत्नीचा जागीच मृत्यू, तीन दिवसात 12 बळी!
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 11:32 AM
Share

बीडः बीड जिल्ह्यात अपघातांची मालिका (Accidents) सुरूच आहे. पाटोदा गावाजवळील वांजरा फाटा येथे कारच्या भीषण अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू (Husband wife killed in Car Accident) झाल्याची बातमी हाती आली आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमध्ये प्रवास करणारे पती पत्नी या दोघांनाही गंभीर (Seriously injured) इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. मागील तीन दिवसातच बीडमध्ये झालेला हा तिसरा भीषण अपघात आहे.

मृत उस्मानाबादमधील भूमचे रहिवासी

बीडमधील पाटोदा गावाजवळ वांजरा फाटा येथे कारला हा भीषण अपघात झाला. कारमध्ये उस्मानाबादमधील भूम येथील रहिवासी अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी होते. या कारचा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप समोर आली नसली तरीही एखाद्या भरधाव वाहनाने कारला धडक दिल्याचे अपघात स्थळावरील दृश्यांतून दिसत आहे. कारमधील अशोक देशमुख आणि संगीता देशमुख हे पती पत्नी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Beed accident

शनिवारी अपघातात 06 ठार

बीडमध्ये शनिवारी अंबाजोगाई तालुक्यातील सायगवाच्या खडी केंद्राजवळही भीषण अपघात झाला. आर्वी येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी जाणाऱ्या नातेवाईकांच्या जीपला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात पाच महिला आणि एक बालक जागीच ठार झाले होते. मागील तीन दिवसातला आज घडलेला तिसरा अपघात असून बीड जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या तीन दिवसात 12 वर पोहोचली आहे.

सांगलीत स्कूल बसला अपघात

सांगली जिल्ह्यात स्कूल बसला झालेल्या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. विद्यार्थ्यांना सोडायला जाणाऱ्या या बसमध्ये जवळपास 25 ते 30 विद्यार्थी होते. बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा आरोप पालकांनी केलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे स्कूल बस थेट शेतात जाऊन पलटी झाली. या घटनेत सात ते आठ विद्यार्थी जखमी झाले.

इतर बातम्या-

School Bus Accident : सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये स्कूल बस पटली! 7 ते 8 विद्यार्थी जखमी

Nashik: किमती गगनाला भिडल्याने बैल चोरीच्या घटना वाढल्या; शेतकरी हवालदिल

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.