AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन ठेवल्यानतंर संतोष देशमुखांचे ‘ते’ वाक्य, वैभवी देशमुखच्या जबाबातून मोठा खुलासा समोर

संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या मुली वैभवी देशमुखने महत्त्वाचा खुलासा केला आहे. हत्येपूर्वी संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात १०-१२ मिनिटे फोनवर संवाद झाला होता, असे तिने सांगितले.

फोन ठेवल्यानतंर संतोष देशमुखांचे 'ते' वाक्य, वैभवी देशमुखच्या जबाबातून मोठा खुलासा समोर
santosh deshmuh vaibhavi deshmukhImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2025 | 8:48 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी आणि सीआयडीकडून कसून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी चौकशी करण्यात आली होती. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी तिने एक धक्कादायक माहिती दिली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी वैभव देशमुखने नुकतंच जबाब नोंदवला. यावेळी तिने संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वडिलांचा आणि विष्णू चाटेचा संवाद झाल्याचे तिने सांगितले. लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता, असा सवाल संतोष देशमुखांनी विष्णू चाटेला विचारला होता, असे वैभवी देशमुखने जबाबात सांगितले आहे. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यातील संवाद १० ते १२ मिनिटे चालला, असेही तिने यावेळी म्हटले.

विष्णू चाटे आणि संतोष देशमुखांचा १०-१२ मिनिटे संवाद

वैभवी देशमुखने नोंदवलेल्या जबाबानुसार, संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवरुन संभाषण झाले होते. संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवर १० ते १२ मिनिटे संवाद चालला. लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता, असा सवाल संतोष देशमुखांनी विष्णू चाटेला विचारला होता. हा फोन विष्णू चाटेचाच होता, असं संतोष देशमुखांनी सांगितलं होतं. विष्णू चाटेचा फोन ठेवल्यानंतर संतोष देशमुखांनी वैभवीला एक वाक्य म्हटलं होतं. माझे काही बरे वाईट झाले तर आई, विराजची काळजी घे, असे संतोष देशमुख म्हणाले होते, असे वैभवी देशमुखने म्हटले होते.

आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

यानंतर वैभवी देशमुखने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “आज पप्पा आमच्यात नाहीत, फार दुःख वाटतं. क्षणाक्षणाला त्यांची आठवण येत आहे. आज पप्पा कुठे दिसत नाहीत. मोर्चामध्ये देखील दिसले नाहीत ते इथे लोक भेटायला येतात, त्यांच्यामध्ये ते दिसत नाहीत तुम्ही जे नाही यासाठी कॉल उचलले आहे. त्याच्यासोबत आम्ही सर्व लोक आहोत असं तुम्ही सांगत आहात आम्ही यासाठी जसं लढतो तसा संपूर्ण महाराष्ट्रात देखील आमच्यासाठी लढत आहे, आरोपी सापडत नाहीत याची खंत वाटत आहे. यासाठी जे उचल पाऊल आहे ते उचलावं. सर्व महाराष्ट्राची एकच मागणी आहे की लवकरात लवकर फाशी द्यावी. यामध्ये आमचे पहिल्यापासून एकच मागणी आहे की समोर कोणी असो आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे”, असे वैभवी देशमुख म्हणाली.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय