AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नाना पटोले यांनी आधी आदर्श नागरिक बनावं”; पटोलेंच्या आरोपानंतर भाजपनं त्यांना उडवून लावलं

भाजपविरोधात तुमच्याकडे जर पुरावे आहेत तर पोलिसांना द्यायचं हे काम तुमचं नाही काय असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला आहे. तुम्ही नागरिकशास्त्र शिकला आहात की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

नाना पटोले यांनी आधी आदर्श नागरिक बनावं; पटोलेंच्या आरोपानंतर भाजपनं त्यांना उडवून लावलं
| Updated on: May 20, 2023 | 5:08 PM
Share

भंडारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ढवळून निघाले आहे. त्यातच दंगलीवरूनही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दंगलीवरून केल्या गेलेल्या आरोपामुळे आता भाजपकडूनही विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना भाजपकडून जातीय तेढ निर्माण केले जात असून त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोपा त्यांनी भाजपवर केला होता. त्यावर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना जातीय आणि धार्मिकतेच्या मुद्यावरून त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती.

त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी सडकून टीका केली आहे. नाना पटोले यांनी आधी आदर्श नागरिक बनावं, त्यानंतर दुसऱ्यावर आरोप करावा असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर टीका करताना म्हणाले की, भाजपाचे चांगले काम आहे असे नाना पटोले का म्हणतील? असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

भाजपवर टीका करणे, धार्मिक आणि जातीयतेचे आरोप करणे हे काँग्रेसचे कामच आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

काँग्रेसचेन नेते कधी म्हणतात आरडीएक्स घेऊन गेले असा त्यांनी आरोप केला असला तरी ते कधी आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करीत नाही असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

भाजपविरोधात तुमच्याकडे जर पुरावे आहेत तर पोलिसांना द्यायचं हे काम तुमचं नाही काय असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला आहे. तुम्ही नागरिकशास्त्र शिकला आहात की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

सातशे गुणांपैकी 25 गुणही शिकले नाही? तुम्ही जर भारतीय आहात तर पोलीसांना माहिती का दिली नाही? असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांना केला आहे. तर भाजपा जातीय तेढ निर्माण करते या त्यांच्या आरोपांवर त्यांनी काँग्रेस आणि पटोले यांचा समाचार घेतला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.