“शेतकऱ्यांना कृषीसाठी 12 तास वीज देणार”; उपमुख्यमंत्र्यांची शेतीसाठी मोठी घोषणा…

आगामी खरीप हंगामासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेले बी-बियाणे आणि रासायनिक खतांचा उपयुक्त साठा उपलब्ध असल्याचेही देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना कृषीसाठी 12 तास वीज देणार; उपमुख्यमंत्र्यांची शेतीसाठी मोठी घोषणा...
Image Credit source: tv 9 Marathi
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 4:36 PM

भंडारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे अजून भरपाई मिळाली नव्हती, मात्र भाजप आणि शिवसेनेचे सरकार आल्यानंतर आम्ही सर्व नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भंडारा येथे हंगामा संदर्भात घेतलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या घोषणेमुळे अवकाळी आणि गारपीटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हंगामा संदर्भात बैठक घेण्यात आली,

त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबादला देणार असल्याचे सांगत भंडारा जिल्ह्यात भात पिकासह तूर, मका आणि सोयाबीन पिकांचे उत्पादन घेतले जाते.

त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेले बी-बियाणे आणि रासायनिक खतांचा उपयुक्त साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रासायनिक खतांची उचल करण्याच्या दृष्टीने भंडाऱ्यात रॅक पॉईंट नसल्याने तुमसर येथे रॅक पॉईंट निर्माण करण्याच्या दृष्टीनेही सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी योजना माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीसाठी 12 तास वीज देणार असल्याचे मोठे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सोलर फिडर लावून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार असल्याचे अश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

त्याच बरोबर 100 गावांमध्ये युक्त शिवार योजनेचे काम हाती घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोलर फिडर लावण्यासाठी जागा खरेदी करण्यात येत असून त्यामधून सोलर फिडरसाठी शेतकऱ्यांना 50 हजार रुपय वार्षिक देण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा येथे बोलताना सांगिते की, धान खरेदीचं वाढीव उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी जी धान खरेदी झाली त्यांचे 99 टक्के शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आलेले आहे.

तर भंडारा जिल्ह्यात चार वेळेस अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान केले आहे, त्यामुले शेतकरीही हैराण झाले आहेत. त्यातील तीन वेळेचे पंचनामे झाले असून शेवटचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात आहेत.

तर 2020-21 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेल्या नुकसानीचा अद्याप मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नसतानाही आमच्या सरकारने मात्र शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला दिल्याचे त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.