AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला मनसेची गरज नाही, आठवलेंनीच ठरवले, शिवसेनेवरही मोठं विधान

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप मनसे एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच आज आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मात्र भाजपला मनसेची आवश्यकता नसल्याचे विधान केले आहे.

भाजपला मनसेची गरज नाही, आठवलेंनीच ठरवले, शिवसेनेवरही मोठं विधान
रामदास आठवलेंनी पुन्हा महाविकास आघाडीला डिवचलं
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 7:26 AM
Share

मुंबई – मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप (bjp) मनसे (mns)एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असताना त्यात खोडा घालण्याचं रामदास आठवले (ramdas athawale) यांनी केलं आहे. ते म्हणतात की, आम्हाला मनसेची आवश्यकता नाही. रामदास आठवले यांनी असं वक्तव्य का केलं असावं असा प्रश्न अनेक राजकीय लोकांना पडला असेल तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील असा प्रश्न पडला असेल. सध्या रामदास आठवले हे पंढरपूर दौर्यावर आहेत, तिथं त्याच्याशी संवाद साधला असता, त्यांना मुंबई महापालिकेतील निवडणुकीविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर त्यांनी अजूनतरी तसा आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नसून आम्हाला मनसेची गरज नाही. रामदास आठवले अशी अनेक हास्यास्पद वक्तव्यं नेहमी करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. परंतु काल पंढरपूर दौ-यावर असताना केलेल्या व्यक्तव्याची दिवसभर चर्चा होती. मनसे आठवलेंना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आरोप-प्रत्यारोप निवडणुकीत फायदा कोणाला

मुंबई महापालिकेची निवडणुक कधीही होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. कारण कोरोनाचं कारण देत आत्तापर्यंत नियमावलीचं पालन करून निवडणुक होईल असं वाटतं होतं. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात कमी असून निवडणूक लवकरचं होईल अशी चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबर मुंबईत सध्या सुरू असलेली आंदोलन आणि आरोप-प्रत्यारोप याचा फायदा राजकीय लोकांना किती होईल हेही पाहणं गरजेचं आहे. कारण मुंबईतलं राजकीय वातावरणं अधिक तापल्याचं आपण काल पाहिलं आहे. पोलिसांनी भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांवरच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई केल्याचं पाहायला मिळालं. सध्या महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे महानगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात कधी येईल यासाठी भाजपकडून अधिक प्रयत्न केले जात आहेत.

आठवले काय म्हणाले

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप मनसे एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच आज आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मात्र भाजपला मनसेची आवश्यकता नसल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज पंढरपूर दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप- मनसे यांची युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे. भाजप सोबत आरपीआय असल्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेला हरवणे फार अवघड नाही. पालिका निवडणुकीत भाजप 120 पेक्षा अधिक जागा मिळवून सत्तेत येणार आहे.संजय राऊत यांच्या टिकेमुळे शिवसेनेवरच निगेटीव परिणाम होत आहे.ईडी , सीबीआय, चा उपयोग संजय राऊत आणि मंत्र्यांच्या विरूध्द करुन सरकार पडेल असा काही विषय नाही अंतर्गत मतभेदामुळेच हे सरकार आपोआप पडेल असे ही मंत्री आठवले यांनी सांगितले.

वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाची थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लाखापर्यंत वाढवली; मंत्री विजय वडेट्टीवारांनी गरजूना केले आवाहन

भाजपचे ‘साडेतीन’ कोण? ED-CBI लाही उत्तर ऐकण्याचं राऊतांचं आवाहन, शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची वेळ काय?

CCTV | कार पार्किंगवरुन बाचाबाची, मुरबाडमध्ये डॉक्टरवर कोयत्याने हल्ला

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.