राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता,पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा
भाजपमध्येही अशी काही लोकं आहेत, ज्या पद्धतीने भाजप पुढे जातो आहे ते यांना नको आहे. येथे व्यक्ती म्हणून कोणी नाही, भाजपचे केडर आहे. येथे संघटन आहे म्हणून आम्ही जिंकलो आहोत. जयकुमार गोरे किंवा इतर कोणी आहे म्हणून नाही असेही गोरे यावेळी म्हणाले.

जे मला गुंड म्हणत आहे, तेच सर्वात मोठे गुंड आहेत.आज माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचे वातावरण आहे.अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे.ज्या पद्धतीने भाजपला मते मिळाली ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी झाली आहे. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता अशी माहिती समोर येत आहे. पोलीस याचा योग्य तो तपास करीत आहेत असा खळबळजनक दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.
हा कट कोणी रचला होता, ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईलच.याप्रकरणामागे कोणता गुंडा आहे. हे समोर येईलच त्यानंतर आपण चर्चा करू असेही जयकुमार गोरे यावेळी म्हणाले.
चौकशी झालीच पाहिजे
चौकशी झालीच पाहिजे असं आमचं देखील मत आहे.त्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्यामुळे त्याबाबतीत अधिकच बोलणं योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे. याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील.तपास यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील असेही गोरे यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले.
सातारा येथील पराभव
पराभव झाल्यानंतर कारणे सांगण्याची मला सवय नाही. पराभव का झाला याचं विश्लेषण मी करणार नाही, मात्र झालेला पराभव मी स्वीकारतो. सोलापूरकडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे.केवळ दुर्लक्ष होणे हे एकमेव पराभवाचे कारण नाही,असे अनेक पराभवाचे धक्के मी स्वीकारलेले आहेत.या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. राजकारणातून प्रत्येक जण अशा पराभव होऊनच पुढे जातो.मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो.कामात सातत्य असले पाहिजे.
पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं, याचाही प्लॅन आखला गेला होता. जर बहुमत नाही मिळालं तर कोणाला सोबत घ्यायचं याचाही प्लॅन केला गेला होता. पक्ष आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्लॅन होता. पक्षापेक्षा आम्ही कसे मोठे आहोत हे दाखवण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. पण मी भाजपच्या कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानतो. कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता ते आमच्या मागे उभे राहिले असेही गोरे यावेळी म्हणाले
