AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकून येईल, भाजप खासदाराचा दावा

राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी केडीएमसीत भाजपचं सरकार येईल, असा दावा खासदार कपिल पाटील यांनी केला आहे (MP Kapil Patil says BJP will win KDMC election)

तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकून येईल, भाजप खासदाराचा दावा
| Updated on: Jan 05, 2021 | 6:13 PM
Share

ठाणे : कल्याण-डोबिंवली महापालिका निवडणूक आता तोंडावर आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात या महापालिकेची निवडणूक होऊ शकते. या निवडणुकीत भाजपच जिंकून येणार, असा दावा खासदार कपिल पाटील यांनी केला आहे. “राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी केडीएमसीत भाजपचं सरकार येईल. केडीएमसी निवडणुकीत तीन काय तीस पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकून येईल”, असा दावा त्यांनी व्यक्त केला (MP Kapil Patil says BJP will win KDMC election).

कल्याणमधील भाजपचे पदाधिकारी निलेश शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला (MP Kapil Patil says BJP will win KDMC election).

राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा प्रचंड तापलाय. या मुद्द्यावरुन भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेलरण्याचा प्रयत्न केला आहे. याच मुद्द्यावरुन कपिल पाटील यांनीदेखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “राज्यात सध्या खिचडी सरकार असल्याने संभाजीनगर हे नाव दिलं जाईल, असं मला वाटत नाही”, असा टोला त्यांनी लगावला.

केडीएमसीत भाजप-मनसे एकत्र येणार?

केडीएमसी निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येणार का याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मुद्द्यावरही खासदार कपिल पाटील यांनी भाष्य केलं. “मनसेने उत्तर भारतीयांचा मुद्दा सोडला तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकते”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

केडीएमसीचं सध्याचं पक्षीय बलाबल काय?

केडीएमसीत सध्या 122 प्रभाग आहेत. 11 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिकेच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. 12 नोव्हेंबरपासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रभाग रचना सोडत होणार होती. मात्र त्याआधी 18 गावांविषयी उच्च न्यायालयाचा निकाल आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

केडीएमसीच्या 122 प्रभागांमध्ये सध्या कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांचा समावेश आहे. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयावर केडीएमसीची प्रभाग रचना ठरणार आहे. दरम्यान, केडीएमसीत गेल्या पाच वर्षात 122 जागांपैकी 52 जागा शिवसेना, 42 जागा भाजप, 4 जागा काँग्रेस, 2 जागा राष्ट्रवादी, 1 जागा एमआयएम, 9 जागा मनसेकडे तर 10 अपक्ष होते.

गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र, आता ही युती नाही. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकते.

शिवसेनेसोबत राष्ट्रवादी, काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याने सेनेला हिंदूत्ववादी मतांचा फटका बसू शकतो. भाजप आणि मनसेची युती झाली तर भाजपला उत्तर भारतीय मतांचा फटका बसू शकतो. कारण मनसेला उत्तर भारतीयांची मते मिळणार नाहीत. येणाऱ्या काळात किती प्रभाग होतात. त्यानुसार निवडणूक होईल. मात्र कल्याण डोंबिवली शिवसेनाचा बालेकिल्ला राहिला आहे. यात भाजप आणि मनसे सत्ताबदल करू शकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...