
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं सुरू आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकीकडे आकड्यांची जुळवाजुळव आणि दुसरीकडे अंतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची देखील रणधुमाळी सुरू झाली आहे. या स्थानिक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार आणि ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, मनोरंजन, क्रीडा क्षेत्राताली महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
कल्याण, ठाकुर्ली–चोळेगावात राष्ट्रसेविका समितीचे सुघोष पथसंचलन
ठाकुर्ली ते चोळेगाव परिसरात राष्ट्रसेविका समितीचे द्विधारा सुघोष पथसंचलन
ठाणे जिल्ह्यातील शेकडो राष्ट्रसेविका सहभागी
गेल्या 90 वर्षांपासून महिलांमध्ये जागृतीसाठी कार्यरत संघटन,
कोकण प्रांतातील दहा जिल्ह्यांत एकाच वेळी पथसंचलन
सामूहिकता, समरसता व देशाच्या उज्वल भवितव्याचा संदेश देत शिस्तबद्ध पथसंचलन संपन्न
नागपुरातून धक्कादायक बातमी समरो आली आहे. भांडेवाडी कचरा डंपिंग यार्डमध्ये काम करत असताना कचऱ्याचा ढिगारा अंगावर कोसळल्याने एका सफाई कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केलं.
कल्याण टिटवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
टिटवाळा, इंदिरानगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा लहान मुलासह दोन ते तीन जणांना चावा
कुत्र्याच्या चाव्यात काही मुले गंभीर जखमी
कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, नागरिकांची महापालिकेकडे मागणी
मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू
दर तासाला 1200 भाविक प्रवास करू शकणार
2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या सात मिनिटांवर
भाविकांना मोठा दिलासा
आपण ज्याला सामाजिक संघटन, सांस्कृतिक संघटन म्हणू शकतो अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म याच नागपूरच्या धरतीवर झाला आहे , जे जगातील सगळ्यात मोठा संघटन आहे, ही छोटी गोष्ट नाही आहे म्हणून मी म्हणून म्हटलं नागपूरच्या धरतीमध्ये काही करण्यासाठी एक चुंबक आहे, जे सगळ्यांना स्वत:कडे ओढून घेतले इथल्या लोकांमध्ये नवीन काहीतरी करण्याचा एक जोश आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेतील कैलासनगर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर प्राण घातक हल्ला झाला आहे. अंबादास कांबळे असे जखमी कार्यकर्त्याचे नाव असून किरण पावशे नावाच्या एका व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा पावशे हा कार्यकर्ता आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू होणार असून त्यामुळे दर तासाला 1200 भाविक प्रवास करू शकणार आहेत. 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या सात मिनिटांवर पोहचणार आहे.
चंद्रपूर येथील काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हे नगरसेवक रवाना झाले आहेत. चंद्रपूरात ६६ जागा असून काँग्रेसला ३०, भाजपाला २३, शिवसेना उबाठा ६, वंचित २, शिवसेना शिंदे १ आणि इतर ४ नगरसेवक निवडून आले आहेत.
सातारा शहरातील शिवतीर्थावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाळीस फूट उंच लढवय्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामासंदर्भात शिल्पज्ञ अनिल सुतार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवतीर्थ परिसराची पाहणी करून चर्चा केली. सातारा नगरपालिका प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीनंतर 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे. या आराखड्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
नालासोपारा पूर्वेतील आचोळे रोड, चंदन नाका परिसरात काल मध्यरात्री दीड ते दोन च्या सुमारास भर रस्त्यावर तुफान हाणमारी झाली. काही तरुणांनी दारूच्या नशेत रस्त्यावर उच्छाद माजवत खुलेआम धिंगाणा घालत एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. गस्तीवरील पोलीस सोडवायला गेले तर त्यांची गाडी रस्त्यावर पाडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
धुळे महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर विजय झालेल्या उमेदवारांनी आपल्या प्रभागांमध्ये ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. यावेळी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या वतीने विविध रस्त्यांवर पडलेला गुलाल उचलण्यात आला. तब्बल 25 टन गुलाल महापालिकेच्या आरोग्य विभागाने झाडून जमा केला आणि तो महापालिकेच्या कंपोस्ट डेपो मध्ये टाकण्यात आला.
कल्याणमधील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीक हळदी सभारंभात जेवण केल्याने 40 ते 50 लोकांना विषबाधा झाली आहे. पाहूण्यांना विषबाधा झाल्याने लग्न सभारंभ रद्द करण्यात आला आहे. वधूसह आई, बहिण यांना ही विषबाधा झाली आहे. आता संबंधित केटर्सवर गुन्हा दाखल करण्यासाठी वधूचे वडील पोलिस ठाण्यात गेले आहेत.
दोन बंधुनी मिळवले यश अभूतपूर्व आहे. दिल्लीच्या शक्तीपुढे दोन बंधूंची लढाई होती. मोठ्या संख्येने मराठी माणूस दोन्ही बंधूंच्या मागे उभा राहिला. यश अपयशाला सामोरे जायचं असतं, आम्ही जाऊ असं ठाकरे शिवसेनेचे नेत अंबादान दानवे म्हणाले.
धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलं आहे. ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यामध्ये शिंदे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी 19 जानेवारीला दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची धाराशिव येथे संयुक्त बैठक होणार असल्याचीही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये नव्या समीकरणाची नांदी पाहायला मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
राज्यातील एकूण 29 महापालिका निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. त्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची लगबग पाहायला मिळत आहे. अशात पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात संयुक्त बैठक सुरू आहे.
बदलापुरात शिंदेंसेनेला मोठा झटका लागला आहे. शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिंदे गटाची घराणेशाही मोडून काढण्यासाठी पक्षप्रवेश झाला असल्याचं भाजप आमदार किसन कथोरे यांनी म्हटलं आहे. राऊतांच्या भाजप प्रवेशामुळे आता शिंदेंसेनेचे 3 नगरसेवकही भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच बदलापूरमधील स्वीकृत नगरसेवकांचा तिढाही कायम आहे.
धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आली असून महापालिकेत 48 नवीन चेहरे आहेत. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, अभियंता, खेळाडू, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक तरुण यंदाच्या निवडणुकीत विजयी झाले.
“अडव्हान्टेज विदर्भचं हे तिसरं वर्ष आहे आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट विदर्भात येत आहे. गडचिरोली आता स्टील हब झालं, मात्र आधी यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. देवेंद्रजी यांनी मोठ्या प्रमाणात विदर्भात इंडस्ट्री आणली. विदर्भातील स्टील हा हाय क्वालिटीचा आहे, त्याची मोठी मागणी आहे. रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षित लोक पाहिजे असून त्यासाठी आम्ही टाटाच्या मदतीने स्किल सेंटर सुरू केले आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले.
चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीत महापौरपदासाठी काँग्रेसच्या अंतर्गत कुरघोड्या सुरू आहेत. दिग्गज काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे सुमारे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. विरोधी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील आपल्या समर्थक सुमारे 12 नगरसेवकांसाठी एकत्रित वेगळी व्यवस्था केली. 2 दिवसात महापौर पदासाठी जाहीर आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हापरिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपची आढावा बैठक घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 57 जागा जिंकत भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
बैठकीस जिल्हा स्तरापासून ग्रामस्तरापर्यंतचे भाजप पदाधिकारी उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 63 जिल्हा परिषद सदस्य व 126 पंचायत समिती सदस्य पदांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
जळगावातील अनुभूती निवासी स्कूलमध्ये मुलींची १७ वर्षाखालील राष्ट्रीय योगासन स्पर्धेला सुरुवात.. राष्ट्रीय योगासन स्पर्धेत देशभरातील ३३ संघांमधील १६७ खेळाडू सहभागी… आर्टिस्टिक सिंगल, ट्रेडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर या चार प्रकारात योगासनाची विविध आसने सादर केली जाणार आहेत… सेमी फायनल व फायनल नंतर प्रत्येक प्रकारातील विजयी खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य देण्यात येणार आहे.
नंदूरबारमध्ये राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दरोडा आणि अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आला होता, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. चौधरी यांचा मुलगा प्रथमेश चौधरी यांना उपनगराध्यक्षपद मिळाल्यानंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीत झालेल्या वादानंतर रात्री शिरीष चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती.
“निवडणुका म्हटलं की हार जीत असतेच. या निकालानंतर आत्मचिंतन करू. जो कौल पुणे आणि पिंपरी चिंचवडकर यांनी दिला आहे तो कौल आम्ही स्वीकारला आहे,” अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
नाशिकचा रामकुंडावर मौनी अमावस्या निमित्ताने उत्तर भारतीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. नाशिक शहरासह राज्यभरातील उत्तर भारतीय गोदा घाटावर स्नानासाठी जमले आहेत. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेतच स्नान करून दानधर्म करण्याला महत्व आहे. त्यामुळे पहाटेपासूनच नाशिकच्या रामकुंडास सह गंगा घाट परिसरात उत्तर भारतीयांची स्नानासाठी आणि पूजा विधीसाठी मोठी गर्दी जमली आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या देवडी पाटी येथे भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात विशाल भोसले, अमर पाटील, आनंद माळी, अर्चना भंडारे, माला साळवे अशी मृतांची नावे आहेत. तर ज्योती टकले ही महिला जखमी आहे. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. हे सर्व भाविक पनवेल मधील असून अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते.
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असले तरी मनसेचे विधानसभा अध्यक्ष आणि उमेदवार संतोष शिंगाडे यांनी होर्डिंग लावून टीका केली आहे. त्यात “भाजप जिंकली पण मीरा-भाईंदर हरला, हा विजय नाही तर जनतेवर अन्याय आहे” असा मजकूर आहे.
महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर गुलाल उधळण्याच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीच कायद्याचे धिंडवडे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदेसेनेकडून विजयी झालेल्या उमेदवारांसह पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजीत जीवनवाल यांनी भररस्त्यात तलवारी नाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अभिजीत जीवनवाल याच्याविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा शिरसाट यांनी देखील तलवार फिरवल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष लागले आहे.
एक घड्याळाला मत द्या आणि तीन कमळाला मतं द्या. पिंपरी चिंचवडमधील मतदारांना क्रॉस वोटिंग करा,असं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ समोर येतोय. या अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रभाग 32 मधून नगरसेविका झालेल्या उज्वला ढोरे आहेत. असा दावा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ने केलाय.त्या आमच्यामुळं नगरसेविका झाल्या मात्र त्यांच्यामुळं प्रभागातील तीन उमेदवारांचा पराभव झालाय. भाजपच्या प्रशांत शितोळे विरोधात राष्ट्रवादीच्या अतुल शितोळे यांचा अवघ्या 290 मतांनी पराभव झाला. यानंतर पक्षाने मतदारसंघात चौकशी केली. त्यानंतर उज्वला ढोरेंनी क्रॉस वोटिंगचा प्रचार केल्याचा दावा करत राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर आरोप ही करण्यात आलेत.
नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर मद्यपी कर्मचाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. अंबड पोलिसात संशयित पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली.15 जानेवारीला मतमोजणीच्या दरम्यान अंबड येथील राजे संभाजी स्टेडियम येथे ललित पाटील हे मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले होते. निवडणूक वाहतूक व्यवस्थापन कामाकरता कर्तव्यावर असताना पाटील मद्यधुंद अवस्थेत होते. मद्यप्राशन केलेले कर्मचारी पाटील यांच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली आहे.
माझा कोणी ड्राइव्हवर नाही. नरेंद्र मोदी, तुम्हाला मला चालवणारी एकच शक्ती. त्या ड्रायव्हरच नाव धर्म आहे असे वक्तव्य आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सृष्टी बनली तेव्हा धर्म बनला.जोपर्यंत भारताला धर्म चालवेल तो पर्यंत भारत विश्वगुरु राहील.देशाचे पंतप्रधान बोलतात संतांना नाही बोलण्यासाठी संकोच होतो. आम्ही चौकीदारी करणारे लोक आहोत, असे ते म्हणाले.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) परिसरात आदमखोर बिबट्याचा आतंक अखेर संपला आहे. 9 जानेवारी रोजी 14 वर्षीय मुलावर हल्ला करून बिबट्याने त्याचा बळी घेतल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण होते. बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक गावांमध्ये मुलांना शाळेत पाठवणे बंद करण्यात आले होते. वन विभागाने सलग 9 दिवस सघन शोध मोहीम राबवून 17 जानेवारी रोजी सायंकाळी खडकीजवळील तलाव परिसरात आदमखोर बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून जनजीवन पूर्वपदावर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
जळगावच्या धरणगाव येथे इराणी महिलेसह तिच्या तीन वर्षाच्या मुलाला बेकायदेशीररीत्या आश्रय दिल्या प्रकरणात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्यात इराणी महिलेला आश्रय देणाऱ्या तसेच मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. महिलेला आश्रय देणारे संशयित आरोपींनी पाकिस्तानमध्ये सलमान भाई आणि सलमान खान नामक व्यक्तींना आंतरराष्ट्रीय व्हिडीओ कॉल व व्हॉट्सॲप कॉल, चॅटिंग केल्याचे उघड झाले आहे.
खुलताबाद नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला मतदान केले. काँग्रेसने आपल्या चार नगरसेवकावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत भूमिकेला विरोध करत चार नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार नवनाथ बारगळ यांना मतदान केले होते. काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केल्यामुळे भाजपाचे नवनाथ बारगळ विजयी झाले होते. या प्रकरणी काँग्रेस तालुका अध्यक्षांनी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे प्रस्ताव पाठवला, आणि हा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे
नाशिकचा रामकुंडावर मौनी अमावस्या निमित्ताने उत्तर भारतीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नाशिक शहरासह राज्यभरातील उत्तर भारतीय गोदा घाटावर स्नानासाठी. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेतच स्नान करून दानधर्म करण्याला महत्व. त्यामुळे पहाटेपासूनच नाशिकच्या रामकुंडास सह गंगा घाट परिसरात उत्तर भारतीयांची स्नानासाठी आणि पूजा विधीसाठी मोठी गर्दी
अजित पवार गटाच्या एकमात्र नगर सेवक म्हणून प्रभाग 21 मधून निवडून आलेल्या आभा पांडे यांनी आज जनतेचे आभार मानण्यासाठी काढली आभार रैली. शांती नगर परिसरात काढली जोरदार रैली. जनतेने माझ्यावर विस्वास दाखविला मी जनतेचा विस्वास खरा करून दाखविणार. माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी हिंदी भाषी , आणि पैशाचा वापर केला असे आरोप लावले होते
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या देवडी पाटी येथे भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात. या भीषण अपघातात विशाल भोसले, अमर पाटील, आनंद माळी, अर्चना भंडारे, माला साळवे अशी मृतांची नावे आहेत तर ज्योती टकले ही महिला जखमी आहे. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळून झाला भीषण अपघात
सांगली निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरंकडून सत्कार करण्यात आला आहे.मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अल्पसंख्यांक आघाडीचे सचिव फारूख जमादार यांच्या मातोश्री बानू जमादार यांच्यासह पॅनलचा विजय झाला आहे.या विजय उमेदवारांचा आमदार पडळकरांच्या हस्ते मिरजेत सत्कार पार पडला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून निवडून आलेल्या पूजा नवले यांच्यावर गुन्हा दाखल
विजयी झाल्यानंतर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवले यांच्या कार्यकर्त्यांकडून धिंगाणा घालत घरात शिरून अश्लील कृत्य आणि आग लावण्याचा प्रयत्न. शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह 15 ते 20 संशयितांवर गुन्हा दाखल
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवूनही नवनियुक्त नगरसेवकांना मान-सन्मान स्वीकारण्यासाठी आणखी २० ते २२ दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्य शासनाने महापौर पदाची आरक्षण सोडत अद्याप जाहीर न केल्याने ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. येत्या तीन-चार दिवसांत आरक्षण सोडत निघण्याची शक्यता असून, त्यानंतर विशेष सभा बोलावणे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबवण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापौरांच्या निवडीनंतरच खऱ्या अर्थाने नवीन सभागृहाचे कामकाज सुरू होणार आहे.
नागपूर महानगरपालिकेत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने आपल्या जागा वाढवत ३४ वर मजल मारली आहे. संख्याबळ वाढल्याने आता पालिकेत आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या शर्यतीत संजय महाकाळकर, दीपक पटेल, अभिजित झा आणि विवेक निकेसे यांची नावे आघाडीवर आहेत. लवकरच काँग्रेसचे निरीक्षक नागपुरात येऊन नवनियुक्त नगरसेवकांशी चर्चा करणार असून, त्यानंतरच ‘गटनेता’ आणि ‘विरोधी पक्षनेता’ पदावर शिक्कामोर्तब होईल. आक्रमक कार्यशैली आणि जातीय समीकरणे जुळवणारा नेता निवडण्यावर पक्षश्रेष्ठींचा भर राहण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी कंबर कसली असून, उमेदवारी अर्ज घेण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होताना दिसत आहे. गेल्या अवघ्या दोन दिवसांत तब्बल २,२०५ अर्जांची विक्री झाली असून, त्या तुलनेत आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ५ तर पंचायत समितीसाठी ४ उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्ष दाखल केले आहेत. ग्रामीण भागात सध्या इच्छुकांची मोठी धावपळ सुरू असून, उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्षीय स्तरावर बैठकांचा धडाका वाढला आहे. अर्जांची ही विक्रमी संख्या पाहता, यावेळेस अनेक मतदारसंघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
नागपूर महापालिकेत आता खऱ्या अर्थाने महिला राज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत १५१ पैकी ७९ जागांवर महिला उमेदवारांनी झेंडा फडकवला असून ७२ जागांवर पुरुष उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, आरक्षित जागांच्या पलीकडे जाऊन खुल्या गटातही महिलांनी आपले कसब दाखवून दिले आहे. महिलांच्या या राजकीय परिपक्वतेमुळे पालिकेचे आगामी कामकाज अधिक प्रभावी होण्याची चिन्हे आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीतून शहराला एक नवे आणि तरुण नेतृत्व मिळाले आहे. १६५ सदस्यांच्या सभागृहात तब्बल १०१ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले असून, यात भाजपच्या ७५ सदस्यांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, यंदा महिलांनी पालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ५० टक्के आरक्षण आणि महिला मतदारांचा वाढलेला टक्का यामुळे ८९ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. नवीन चेहऱ्यांचा उत्साह आणि महिलांचा निर्णायक सहभाग यामुळे पुण्याच्या आगामी पंचवार्षिक कारभारात विकासाची नवी दिशा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पुण्यातील हवामानात सध्या कमालीची तफावत पाहायला मिळत आहे. पहाटेचा गारवा ओसरल्यानंतर दुपारच्या वेळी उन्हाचा पारा तीव्र होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. किमान आणि कमाल तापमानात झालेल्या या बदलामुळे थंडीचा जोर पूर्णपणे ओसरला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. काही उपनगरांमध्ये दमट हवेमुळे उकाडा असह्य होत असून, अचानक झालेल्या या हवामान बदलाचा परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे.
पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक दावेदारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून गुडघ्याला बाशिंग बांधून ते तयार आहेत. मात्र, यावेळेस महापौर पदाचे आरक्षण नेमके कोणासाठी सुटणार, यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. मागील वेळी हे पद खुल्या गटासाठी असल्याने, यावेळेस अनुसूचित जाती (महिला) किंवा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षणामुळे आपली संधी हुकू नये, यासाठी अनेक इच्छुकांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवले आहेत.
पुण्यातील राजकीय समीकरणे आणि उमेदवारांच्या पळवापळवीला कंटाळून पुणेकर मतदारांनी आपला कौल ‘नोटा’च्या पारड्यात टाकला आहे. सराईत गुन्हेगारांना दिलेली उमेदवारी आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या ओढाताणीवर पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सुमारे १२ टक्के म्हणजेच २ लाख १६ हजारांहून अधिक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत न देता ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. निवडणूक आयोगाच्या या सुविधेचा वाढता वापर राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.