AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेला तो परतलाच नाही; 39 वर्षीय शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?

शेतकरी शेतात गेला होता. वादळ, वार सुटलं. यात तो सापडला. आपल्या कुटाराची गंजी व्यवस्थित करायला गेला. तेवढ्यात...

शेतात कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेला तो परतलाच नाही; 39 वर्षीय शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: Apr 08, 2023 | 2:02 PM
Share

बुलढाणा : हवामान खात्याचा अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील पीक हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकाची मोठी आशा होती. परंतु गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा हे पीक हातून निघून गेले. आता झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, मका, ज्वारी, गहू यासह फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेला होता

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दुर्घटना घडली. 39 वर्षीय शेतकरी गोपाल महादेव कवळे यांच्यावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत शेतकरी गोपाळ कवळे हे त्यांच्या अंबिकापूर शिवारातील शेतात कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेले होते.

दरम्यान विजांचा कडकडाट सुरू होवून अंगावर वीज पडली. यात गोपाल कवळे यांचा मृत्यू झाला. याबाबत खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृ्त्यू

दुसऱ्या घटनेत, अमरावती जिल्ह्यात काल वादळी पावसासह गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलापूर गावात शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. गोपाल करपती वय वर्षे 35 अशी मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतातील पिकांचे मोठे नुकसान

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा, कौडण्यापूर गावात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आमला, लोणी टाकळी, दहिगाव गावात चक्रीवादळ आले. अनेक घरांवरील तीन पत्रे व छप्पर उडाल्याने घरातील साहित्यांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे मात्र काही प्रमाणात असलेला गहू, हरभरा तसेच टरबूज,कांदा, भाजीपाल्यासह संत्रा पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.