AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंब्याची कोय या कार्यालयात जमा करण्यासाठी लावला फलक, ध्येयवेडा अधिकारी पाहून…

असा ध्येयवेडा अधिकारी तुम्ही पाहिला आहे का ? गावरान आंब्याच्या कोय जमा करून 7 हजार रोपे तयार केली आहेत. मागील दहा वर्षांपासून जोपासला गावरान आंब्याची झाडं लावण्यासाठी त्यांनी काय केलंय एकदा वाचा

आंब्याची कोय या कार्यालयात जमा करण्यासाठी लावला फलक, ध्येयवेडा अधिकारी पाहून...
buldhana news Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 30, 2023 | 10:54 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana)येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील (Department of Public Works) एका ध्येयवेड्या अधिकाऱ्यानं गावरान आंब्याच्या झाडा खाली पडलेल्या किंवा घरातील आंबे खाल्ल्यानंतर त्या कोय जमा करून, त्यापासून गावरान आंब्याची रोप तयार केली आहेत. हा त्यांचा छंद असून मागील दहा वर्षांपासून त्यांनी तो जोपासला आहे. एव्हढेच काय हा संपूर्ण खर्च ते स्वतः च्या खिशातून करतात. तर काही त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याला हातभार लावला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बुलढाणा (buldhana viral news) जिल्ह्यात त्यांची सगळीकडं त्यांची चर्चा असते.

ध्येयवेड्या अधिकाऱ्याच्या कामगिरीचे कौतुक

बुलढाणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता असलेले व्ही. पी. देशमुख हे मागील दहा वर्षांपासून नामशेष होत चाललेल्या गावरान आंब्याची रोपे तयार करून ते शाळा, ग्रामपंचायत, मंदिर परिसर किंवा रस्त्यावर ज्या ठिकाणी जागा असेल, त्या ठिकाणी ती रोपे लावण्यासाठी देतात. त्या पद्धतीचा त्यांनी एक फलक उप कार्यकारी अभियंता देशमुख यांनी त्यांच्या कार्यालयात लावला असून तो या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतोय.

पाहा बॅनरवरती काय लिहिलंय

देशमुख यांनी त्या फलकाच्या माध्यमातून आवाहन केले आहे की, ‘सध्या आंबा खाण्याचे दिवस असून आपण आंबा खाल्ल्यावर त्या कोया फेकून न देता, त्या कोया आमच्या कार्यालयात आणून द्या, किंवा आम्ही तुमच्या घरून घेऊन जाऊ, जेणेकरून गावरान आंब्याची रोपे तयार करण्यास मदत होईल’ अशा पद्धतीचा त्यांनी बॅनर लावला आहे.

गावरान आंबा टिकावा यासाठी प्रयत्न करावे

दरवर्षी हे अधिकारी चार ते पाच हजार रोपे तयार करतात. यावर्षी सुद्धा त्यांनी 7 हजार रोपे ही त्यांच्या कार्यालयाच्या आवारातच तयार केली आहेत. ते स्वतः त्या रोपांची दररोज काळजी घेतात आणि आंब्याच्या कोया सुद्धा ते सुट्टीच्या काळात जमा करून आणतात. तर समाजातील इतरही लोकांना त्यांनी आवाहन केले आहे की, गावरान आंबा टिकावा यासाठी प्रयत्न करावे, आणि आंब्याच्या कोया आणून द्याव्यात.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.