Buldhana Suicide : बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना

नांदुरा तालुक्यातील तरोडा नाथ येथील अल्पवयीन मुलीचे मोताळा तालुक्यातील गोशिंग येथील राहणारा शेख अल्ताफ शेख शकील या 21 वर्षीय युवकाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होते. सोमवारी 21 मार्च रोजी दोघेही सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घरून निघून गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी परतले नसल्याने घरच्या लोकांनी सर्वत्र शोध घेतला.

Buldhana Suicide : बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना
बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 7:06 PM

बुलढाणा : अज्ञात कारणावरुन एका प्रेमीयुगुला (Couple)ने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील गोशिंग शिवारात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रेमीयुगुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Couple commits suicide by jumping into a well in Buldhana)

कालपासून दोघेही बेपत्ता होते

नांदुरा तालुक्यातील तरोडा नाथ येथील अल्पवयीन मुलीचे मोताळा तालुक्यातील गोशिंग येथील राहणारा शेख अल्ताफ शेख शकील या 21 वर्षीय युवकाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होते. सोमवारी 21 मार्च रोजी दोघेही सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घरून निघून गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी परतले नसल्याने घरच्या लोकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र दोघे कुठेही सापडले नाहीत. या प्रकरणी दोन्ही परिवारांकडून पोलिसांत हरवल्याची तक्रारही देण्यात आली होती. मात्र मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह गोशिंग शिवारात एका शेतातील विहिरीत आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे.

गोंदियात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अज्ञात कारणावरुन 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आमगाव तालुक्यातील मोहगाव येथे घडली आहे. भुपेंद्र दुर्गाप्रसाद पाठक असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तरुणाचे आई व बहिण बाहेरगावी गेले होते आणि वडील हे गायी म्हशी चारण्याकरीता जंगल परिसरात गेले होते. त्यामुळे घरी कुणीच नव्हते. हीच संधी साधत भूपेंद्रने गळफास लावून घेतला. भूपेंद्रने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत्यूदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवला. (Couple commits suicide by jumping into a well in Buldhana)

इतर बातम्या

Ambernath Lift Collapse : अंबरनाथमध्ये दुसऱ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळून सात महिला जखमी, दोघींचे पाय मोडले

Chandrapur | कोळसा वसाहतीत गटार लाईनची स्वच्छता, 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.