AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राज्यात गद्दारीची बीजे आधी कुणी पेरली?;” प्रतापराव जाधव यांनी नाव सांगितलं

शरद पवार यांनी गद्दारी करत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले.

राज्यात गद्दारीची बीजे आधी कुणी पेरली?; प्रतापराव जाधव यांनी नाव सांगितलं
खासदार प्रतापराव जाधव
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 18, 2023 | 2:44 PM
Share

बुलढाणा : महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी गद्दारीचे बीज शरद पवारांनी रोवले. असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सोडले. राष्ट्रवादीचे नेते आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी गद्दारीचे बीज शरद पवारांनी रोवली, अशी घणाघाती टीका बुलाढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलीय. शरद पवार यांनी गद्दारी करत वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले. उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवार यांच्या विचारांचा एवढा पगडा होता की शरद पवार हे ब्रम्हदेव आहेत. ते जादूची कांडी फिरवून सर्व समस्यांचे निराकरण करतात. असं उद्धव ठाकरे यांना वाटत होतं.

मुख्यमंत्री ठाकरे, सत्ता पवारांच्या हाती

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मात्र सत्ता अजित पवार गाजवत होते. अशी चौफेर फटकेबाजी खासदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे.

बुलढाण्यात आमचा पालकमंत्री नव्हता

जाधव भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना प्रतापराव जाधव म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा त्यांना एवढा अभिमान आला की, घराच्या बाहेर ते कधी पडले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सत्ता गाजवत होते अजित पवार. बुलडाण्यात चार आमदार होते. पाचवा मी खासदार होतो. पण, पालकमंत्री म्हणून नेमण्यात आलं ते राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराला. सत्ता महाविकास आघाडीची असताना विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजवावी लागली.

आमची गद्दारी नव्हे उठाव

अनेक वेळी एकनाथ शिंदे यांना सांगायचो हे काही खरं नाही. पुढच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरोश्यावर निवडणुका जिंकू शकत नाही. समविचारी पक्षासोबतचं आपण गेलं पाहिजे. असे माझ्यासारखे अनेक लोकं शिंदे यांना सांगत होते. ५६ पैकी ४० आमदार, १८ पैकी १३ खासदार हे शिंदे यांच्या बाजूला आहेत. काही लोकं म्हणतात, यांनी गद्दारी नव्हती. हा आमचा उठाव होता, असंही प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार