AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप विजयाचा आणखी एक योग 43 वर्षांनी जुळून आला, झिम्बाब्वेचं जिंकणं टीम इंडियासाठी लकी!

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला दुबळ्या झिम्बाब्वेने धोबीपछाड दिला आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत करत स्पर्धेत मोठा उलटफेर केला. या विजयामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे.

टी20 वर्ल्डकप विजयाचा आणखी एक योग 43 वर्षांनी जुळून आला, झिम्बाब्वेचं जिंकणं टीम इंडियासाठी लकी!
टी20 वर्ल्डकप विजयाचा आणखी एक योग 43 वर्षांनी जुळून आला, झिम्बाब्वेचं जिंकणं टीम इंडियासाठी लकी!Image Credit source: PTI
| Updated on: Feb 13, 2026 | 8:21 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. त्याला कारण तसंच आहे. गेल्या काही वर्षात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे सलग टी20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. आता काही योग देखील जुळून आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते खूश झाले आहेत. हे काही तज्ज्ञ किंवा भारतीय चाहत्यांचं मत नाही, तर तसा योगच दिसत आहे. याचं कारण ठरला आहे ते झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय.. झिम्बाब्वेने गट ब मध्ये ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीचं ऑस्ट्रेलियाचं गणित चुकलं आहे. तर झिम्बाब्वे सुपर 8 फेरीत जागा मिळवेल अशी स्थिती आहे. या गटाशी टीम इंडियाचं काही देणं घेणं नाही. पण योग विजयाचं गणित जुळवून जात आहे.

क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात झिम्बाब्वेने तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. जेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तेव्हा भारताने जेतेपदाची चव चाखली आहे. सर्वात पहिल्यांदा हा योग 1983 साली म्हणजेच 43 वर्षांपूर्वी जुळून आला होता. तेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं आणि भारताचे पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर झिम्बाब्वेने 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. तेव्हा भारताने जेतेपद मिळवलं होतं. आता 19 वर्षानंतर झिम्बाब्वेने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पराभूत केलं आहे. त्यामुळे यंदाही भारत जेतेपद मिळवेल असं भाकीत काही क्रीडाप्रेमी वर्तवत आहेत.

खरं तर योग वगैरे जेतेपदाचं गणित काही सोडवत नाही. पण त्याची चर्चा होत असते. जेतेपदासाठी चांगल्या कामगिरीची गरज असते. मग योग जुळून यावा की नाही यावर काही ठरत नाही. भारताने या स्पर्धेत जबरदस्त सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेला, दुसऱ्या सामन्या नामिबियाला पराभूत केलं आहे. आता भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर सुपर 8 फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर सुपर 8 फेरीत तगडे संघ असून खरा कस लागणार आहे.

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...