AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम मतं कुणाला हवीय? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोख कुणावर ? काय म्हणाले बावनकुळे…

पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच दरम्यान मुस्लिम मतं मिळवण्याच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकरण रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

मुस्लिम मतं कुणाला हवीय? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोख कुणावर ? काय म्हणाले बावनकुळे...
Image Credit source: Google
| Updated on: Feb 24, 2023 | 1:55 PM
Share

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात प्रचार सुरू असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar )  यांच्यासहित उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेमंत रासने यांच्या विजयाचा दावा करत असतांना रासने यांच्या विजयाची कारणेही सांगून टाकली आहे. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल करत असतांना मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

कसब्याची निवडणूक लढत असतांना आम्ही विकासावर निवडणूक लढत आहे. पण आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. जी टीका आम्ही बोलू शकत नाही त्या भाषेत आमच्यावर टीका केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतांना महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत रासने हे शंभर टक्के निवडून येईल असा दावा करत मुक्ता टिळक आणि गिरीश बापट यांनी कामं केली असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत का? शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा एक नेता हिंदू विरोधी भाषण करतो, शरद पवार त्याला थांबवत नाही, हे चुकीचे आहे, पवारांनी भाषण थांबवलं पाहिजे होते असं बावनकुळे यांनी म्हणलंय.

याशिवाय पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे आणि राहिलेल्या लोकांना थांबवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मध्यावधीची वक्तव्य करतायत असाही पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.

तर कसबा हा गिरीश बापटांचा आहे, मुक्ता टिळक यांनी कसब्यात मोठी कामं केली आहेत, त्यानंतर आता हेमंत रासने या मतदारसंघात विकासकामं करणार, कसब्यात आमचा 100 टक्के विजय आहे असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे हे पुण्यात तळ ठोकून आहे. बावनकुळे यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने दोन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतांना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत आहे.

प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार संघात अनेक दिग्गज नेत्यांचा दौरा आहे. दोन्ही निवडणुका या प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील विजय महत्वाचा असणार असल्याने या पोटनिवडणूकीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.