AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिपद किती वेळा आले अन् गेले, भुजबळ कधी संपले नाही? छगन भुजबळ यांचा थेट पक्षातील श्रेष्ठींना इशारा

Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मी ओबीसीची लढाई लढलो. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अर्थात त्यात लाडकी बहीणचा वाटा आहे. परंतु ओबीसींचा सपोर्टही आहे. ओबीसींच्या लढाईमुळे यश मिळाले आहे, असे ज्यांना वाटते त्यांच्याबद्दल मी आभारी आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.

मंत्रिपद किती वेळा आले अन् गेले, भुजबळ कधी संपले नाही? छगन भुजबळ यांचा थेट पक्षातील श्रेष्ठींना इशारा
chhagan bhujbal, Ajit pawar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 16, 2024 | 12:43 PM
Share

Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून सुरु होती. अखेर सोमवारी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा दिला. आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ते म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? काही फरक पडत नाही. मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले. पण भुजबळ काही संपले नाही, असे वक्तव्य करत त्यांनी पक्षश्रेष्ठींना इशारा दिला.

अजित पवार यांच्याशी चर्चा नाही

मंत्रिपद मिळाले नाही, त्यानंतर पक्षातील नेत्यांशी किंवा अजित पवार यांच्याशी काही चर्चा झाली का? त्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, मी कालपासून काही चर्चा केली नाही. मी कुणाशी बोललो नाही. पुढे काय करायचे हे माझ्या लोकांशी, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार आहे. तुम्ही शरद पवार यांच्याकडे जाणार का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, शरद पवार यांच्याकडे मी १२ डिसेंबरला जाऊन आलो ना.

ओबीसीमुळे महायुतीला यश

मी ओबीसीची लढाई लढलो. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अर्थात त्यात लाडकी बहीणचा वाटा आहे. परंतु ओबीसींचा सपोर्टही आहे. ओबीसींच्या लढाईमुळे यश मिळाले आहे, असे ज्यांना वाटते त्यांच्याबद्दल मी आभारी आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.

मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे हे बक्षीस

मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे हे बक्षीस मिळाले, अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी माध्यमांकडे बोलताना दिली. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांचा वाद राज्यभर गाजला. या वादात छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांची कोंडी झाली होती. छगन भुजबळ व मनोज जरांगे वादाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे मत पक्षातील काही लोकांनी व्यक्त केले होते.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?