AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 29.53 टक्के

इयत्ता दहावीचा जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 29.53 टक्के लागला आहे. 51 हजार 313 विद्यार्थ्यांनी जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षा दिली होती. 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण उत्तीर्ण झाले आहे.

इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 29.53 टक्के
| Updated on: Jul 14, 2026 | 5:38 PM
Share

इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यंदा राज्यभरात एकूण 29.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला 51 हजार 313 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागनिहाय निकालात नाशिक विभाग 41.45 टक्क्यांसह अव्वल, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 34.27 टक्के लागला आहे. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीही ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी यांनी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षाचे निकाल जाहीर केले आहे.   गेल्या वर्षी १० च्या पुरवणी परीक्षेचा निकाल 36.48टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात 6.96 टक्क्यांनी घट झाली आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी 53 हजार 880 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात 37 हजार 924 मुले, 14  हजार 956 मुली होत्या. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10हजार 224  मुले, 4 हजार 933 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 34.6 टक्के मुली, तर 27.75 टक्के मुले उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत 18 हजार 482  विद्यार्थी एक किंवा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न झाल्याने ते एटीकेटीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष  2026-27 मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीला प्रवेश घेता येईल असे पत्रकात म्हटले आहे.

इयत्ता 10 वी पुरवणी परीक्षा – जून-जुलै 2026

निकाल जाहीर : 14 जुलै 2026

– नोंदणी : 52 हजार 880

– परीक्षेला बसले : 51 हजार 313

– उत्तीर्ण : 15 हजार 157

– राज्याचा निकाल : 29.53%

विभागनिहाय निकाल

– नाशिक – 41.45%

– नागपूर – 39.42%

– लातूर – 34.55%

– छत्रपती संभाजीनगर – 34.27%

– अमरावती – 30.36%

– पुणे – 23.99%

– कोल्हापूर – 18.53%

– मुंबई – 17.73%

– कोकण – 12.26%

Follow Us
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप