AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट धूळखात, महिनाभरापासून समृद्धी महामार्गाचं काम ठप्प

अमरावती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचं काम गेल्या महिनाभरापासून बंद आहे. कंत्राटदाराने अवैध गौण खनिज उत्खनन केल्याने या मार्गाचं कामकाज रखडले आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी कंत्राटदारास 18 कोटी 14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागपूर-मुंबई या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. […]

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट धूळखात, महिनाभरापासून समृद्धी महामार्गाचं काम ठप्प
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

अमरावती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचं काम गेल्या महिनाभरापासून बंद आहे. कंत्राटदाराने अवैध गौण खनिज उत्खनन केल्याने या मार्गाचं कामकाज रखडले आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी कंत्राटदारास 18 कोटी 14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नागपूर-मुंबई या 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची गरज असल्याने कंत्राटदारांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, धामणगाव आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आसपासची शेती विकत घेऊन, त्यातील साठ हजार चारशे चौतीस ब्रास माती,मुरूम या रस्त्यासाठी उत्खनन करुन आणली. मात्र  या उत्खननाची परवानगी न घेतल्याने महसूल विभागाने नोटीस बजावून, उत्खननास मनाई केली आणि कंत्राटदारावर 18 कोटी 14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून या महामार्गचं काम रखडले आहे. यामुळे सगळी मशनरी,पोकलँड,टिप्पर, ट्रक आणि मजूर किरजवळा परिसरात थांबून आहेत.

मुख्य कंत्राटदार नागार्जुन कंपनीने 5 विविध कंपन्यांना कामे दिली आहेत. या कंत्राटदारांनी कामाला सुरुवात देखील केली. मात्र गौण खनिज उत्खननाची परवानगी न घेतल्याने 1 महिनाभरापासून काम बंद आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगी मिळावी यासाठी प्रक्रिया केली, मात्र अद्यापपर्यँत तरी जिल्हाधिकारी कार्यलयातून परवानगी मिळाली नाही, असा कंपनीचा दावा आहे.

14 नोव्हेंबर 2018 रोजी राज्य सरकारने समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या गौण खनिजांची महसूल माफ करण्यासंदर्भात आदेश काढला आहे. जर शासनाने रॉयल्टी माफ करण्याचा आदेश काढला आहे, तर मग दंड आकारून मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या महामार्गाचं काम जिल्हा प्रशासनाने का थांबवले, असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मात्र याबाबत एकही अधिकारी बोलायला तयार नाहीत.

समृद्धी महामार्गासाठी 250 कोटी

समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकडून 250 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला आज 250 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सहाद्री आतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा धनादेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

महाराष्ट्र कृषी समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी विविध संस्थांकडून भूसंपादनासाठी दुय्यम कर्ज स्वरुपाची रक्कम उपलब्ध करून देण्याबाबत झालेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्राच्या औद्योगिक  विकास महामंडळाने यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाला एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या कामासाठी अधिक गती प्राप्त व्हावी यासाठी आज पुन्हा नव्याने अडीचशे कोटी रुपयांचा दुय्यम कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक राधेश्याम मोपलवार, एमआयडीसीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र सावंत यावेळी उपस्थित होते.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.