AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर कोकण दौऱ्यावर जाण्याची शक्यता, नुकसानीची पाहणी करणार

सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार आहेत. (CM Uddhav Thackeray May Visit Konkan Region after Dussehra)

उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर कोकण दौऱ्यावर जाण्याची शक्यता, नुकसानीची पाहणी करणार
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 21, 2020 | 10:49 AM
Share

मुंबई : सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौरा करण्याची शक्यता आहे. कोकणातील नुकसानग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधू शकतात. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा दसऱ्यानंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (CM Uddhav Thackeray May Visit Konkan Region after Dussehra)

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूरचा दौरा केला होता. तर आज (बुधवार, 21 ऑक्टोबर) ते उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.

दसऱ्यानंतर मुख्यमंत्री कोकण दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दौऱ्याची रुपरेषा सध्या आखली जात आहे. “मी कोकणात येणार आहे, दसऱ्यानंतर येईन” असे उद्धव ठाकरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची चर्चा करताना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्याची पाहणी करु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान येत्या 24 ऑक्टोबरला मुख्यमंत्री कोकण दौरा करु शकतात, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा

उद्धव ठाकरेंनी सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मदतीचे चेक दिले होते. मात्र ही तात्पुरत्या स्वरुपाची मदत न देता भरघोस मदत द्या, अशी मागणी बळीराजा करत आहे.

अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सोलापूरच्या अतिवृष्टीग्रस्तांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. (CM Uddhav Thackeray May Visit Konkan Region after Dussehra)

संबंधित बातम्या : 

CM Uddhav Thackeray Osmanabad Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर, थेट बांधावर जात बळीराजाचे अश्रू पुसणार

सोलापुरात चेक वाटप, उस्मानाबादमध्ये काय? मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचं लक्ष

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...