AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा : उद्धव ठाकरे

"बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा", असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं (CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis).

बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा : उद्धव ठाकरे
| Updated on: Oct 19, 2020 | 3:39 PM
Share

सोलापूर : “शेतकऱ्यांच्या मदतीवरुन राजकारणाचा चिखल कुणीही एकमेकांवर उडवू नये. विरोधी पक्षनेतेदेखील महाराष्ट्रातील जबाबदार नेते आहेत. जनतेला दिलासा देण्याचं काम आहे. केंद्र आणि राज्य सरकार काय करेल यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात, त्यासाठी आधी काम करा. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं (CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis).

उद्धव ठाकरे यांनी आज (19 ऑक्टोबर) सोलापूरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या टीप्पणीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रत्युत्तर दिलं (CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis).

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याबाबत टीप्पणी केली होती. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं. असंही ते बिहारला जातच आहेत, दिल्लीतही जावं”, असं मिश्किल उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची सुरुवात केलेली आहे. पण, केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. केंद्र सरकार हे पक्षाचं सरकार आहे. कदाचित ते पक्षाच्यादृष्टीने विचार करत असतील. पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे, हे आज आपण सर्व बघत आहोत. त्याने काही बोलावं, काही मागावं, त्यापेक्षा त्याचं दु:ख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ते आम्ही केल्याशिवाय राहणार”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फोन केला. त्यामुळे आमची खात्री पटली जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू आणि ते नक्की दिल्याशिवाय राहणार नाहीत”, असा विश्वासदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

केंद्र सरकार हे देशाचं सरकारं आहे परदेशातलं नव्हे, राज्यांची काळजी घेणे कर्तव्य- मुख्यमंत्री

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.