AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सागरी किनारपट्टी असलेल्या राज्याची परिषद मच्छीमारांसाठी ३ मोठ्या मागण्या, काय म्हणाले नितेश राणे

आमच्या मुलांना मुघलांचा इतिहास आणि प्रेम काँग्रेसमुळे दाखवले जात होते आता ते थांबेल असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

सागरी किनारपट्टी असलेल्या राज्याची परिषद मच्छीमारांसाठी ३ मोठ्या मागण्या, काय म्हणाले नितेश राणे
Follow us
| Updated on: Apr 28, 2025 | 3:46 PM

सागरी किनारपट्टी असलेल्या सर्व राज्यांची एक समिट पार पडली आहे. महाराष्ट्र सरकार आणि मस्त्य व्यवसाय खात्याने या कार्यक्रमाचे यजमान पद भूषविले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि भारत सरकारकडे मस्त्य व्यवसाय मंत्री म्हणून काही मागण्या केल्या आहेत. एलईडी फिशिंग संदर्भात जे नियम आहेत, ते आणखीन कडक करण्यात यावेत, महाराष्ट्र किनारपट्टीवरील एलईडी फिशिंग पूर्णपणे बंद करावी. किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार समाजावर सीआरझेडची टांगती तलवार असते. त्यांना सातत्याने नोटीस दिली जात असते. याबद्दल केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेप्रमाणे प्रत्येक मच्छीमाराचे घर सीआरझेडचे नियम शिथील करून अधिकृत करण्याची योजना आणावी अशी मागणी मस्त्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

तिसरी मागणी म्हणजे अनधिकृत मासेमारी होते, गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांचे मंत्री येथे आले होते. याराज्याचे ट्रॉलर येथे येऊन मासेमारी करून जातात. त्यांच्यावर कारवाई करावी. एक कालावधी निश्चित करून मासेमारी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. या काही मागणी केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मागण्यांकडे पाहिले जाईल असेही मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावावे

ज्या काँग्रेसने भगवा आतंकवाद असा उल्लेख केला होता. म्हणून दहशतवादाला रंग नाही असे वडेट्टीवार कसे म्हणू शकतात. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य ऐकावीत. त्यांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करण्याची आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावावे असेही विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

…त्यांनी तात्काळ बॅग भरून निघावे, ज्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम आहे त्यांनी तात्काळ बॅग भरून निघावे, अशा एकालाही इथे ठेवणार नाही. तंगड्या हातात देण्याची वेळ आणू नका असेही नितेश राणे यांनी म्हटले जाते. पाकिस्तानवर प्रेम येतेय त्यांनी अब्बाकडे निघून जावे, नाहीतर हा करण्याची भूमिका घ्यावी लागेल

अबु आजमी यांनी लोकांची भावना समजून घेतली पाहिजे, लोकांच्या मनात चीड आहे. जनसामान्यांमध्ये राग आहे तो विविध पद्धतीने निघत आहे. ncert च्या सातवीच्या धड्यातून मुघल सम्राटांचा इतिहास वगळला आहे.त्यावर बोलताना राणे यांनी जे पेरले आहे तेच उगवत आहे, औरंगजेब प्रेम कुणी सुरु केले. आमच्या मुलांना मुघलांचा इतिहास आणि प्रेम काँग्रेसमुळे दाखवले जात होते आता ते थांबेल असेही राणे यांनी म्हटले आहे.

योगेश कदम माझे मित्र आहेत

ते माझे मित्र आहेत. दुसऱ्यावर जाणारा बाण त्यांनी अंगावर का घेतला हे माहिती नाही? आपले हिंदूत्ववादी सरकार आहे, हेच दहशतवादी आणि जिहाद्यांना हवे आहे.जेव्हा दंगल घडली तेव्हा विटा आणि दगड कुणी मारले.याविरुद्ध आपण हिंदू म्हणून भूमिका घ्यायला हवी. पक्षाच्या चौकटीत राहू नये.हिंदू म्हणून एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून लढण्याची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट.
काय आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण?
काय आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण?.
वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागेल ती मी लढणार - सुप्रिया सुळे
वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागेल ती मी लढणार - सुप्रिया सुळे.
वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल; धक्कादायक माहिती आली समोर
वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल; धक्कादायक माहिती आली समोर.
तीच माझी मोठी चूक... वैष्णवी हगवणेची मैत्रिणीसोबतचा ऑडिओ व्हायरल
तीच माझी मोठी चूक... वैष्णवी हगवणेची मैत्रिणीसोबतचा ऑडिओ व्हायरल.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण; लग्नात अजित पवारांचीही होती उपस्थिती
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण; लग्नात अजित पवारांचीही होती उपस्थिती.
पुण्यातील 3 ठिकाणं बॉम्बने उडवणार, पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन अन्..
पुण्यातील 3 ठिकाणं बॉम्बने उडवणार, पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन अन्...
भारतात पुन्हा कोरोना, देशात 257 रूग्ण तर मुंबईचा आकडा ऐकून भरेल धडकी
भारतात पुन्हा कोरोना, देशात 257 रूग्ण तर मुंबईचा आकडा ऐकून भरेल धडकी.
खासदारांच्या शिष्टमंडळावर राऊतांचा निशाणा,टुर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणत..
खासदारांच्या शिष्टमंडळावर राऊतांचा निशाणा,टुर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणत...
हा नियतीने घेतलेला सूड आहे; राऊतांची फडणवीसांवर घणाघाती टीका
हा नियतीने घेतलेला सूड आहे; राऊतांची फडणवीसांवर घणाघाती टीका.