AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विखेंसह पाच आमदारांवर कारवाईसाठी काँग्रेस निकालाची वाट पाहणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला यशाची अपेक्षा आहे. पण असं असताना काँग्रेसला मदत न करणाऱ्या स्वपक्षीयांवर मात्र काँग्रेसने आस्ते कदम घेतल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास पाच नेत्यांवर काँग्रेसवर कारवाईसाठी हळूहळू पावलं उचलायचा पवित्रा घेतलाय. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करुनही काँग्रेसने कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही. काँग्रेसच्या पाच नेत्यांनी पक्षाविरोधात लोकसभा निवडणुकीत काम केलं. त्यात राधाकृष्ण विखे […]

विखेंसह पाच आमदारांवर कारवाईसाठी काँग्रेस निकालाची वाट पाहणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला यशाची अपेक्षा आहे. पण असं असताना काँग्रेसला मदत न करणाऱ्या स्वपक्षीयांवर मात्र काँग्रेसने आस्ते कदम घेतल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास पाच नेत्यांवर काँग्रेसवर कारवाईसाठी हळूहळू पावलं उचलायचा पवित्रा घेतलाय. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करुनही काँग्रेसने कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही.

काँग्रेसच्या पाच नेत्यांनी पक्षाविरोधात लोकसभा निवडणुकीत काम केलं. त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर चार आमदारांचा समावेश आहे. पण त्यांच्यावर कारवाई करताना काँग्रेसने आस्ते कदमची भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यापेक्षा लोकसभा निकालापर्यंत प्रतीक्षा करायच्या तयारीत काँग्रेस आहे. काही ठिकाणी काँग्रेस आमदारांनी स्वतःच्या पक्षाचंच काम केलं नाही, तर काही ठिकाणी आघाडीधर्म पाळलेला नाही. सर्वात मोठा प्रश्न काँग्रेससमोर विखे यांचा आहे. कारण विखे यांचं बडं प्रस्थ आहे. त्यात ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांचा पक्षाला उपयोग होऊ शकतो. म्हणून लगेच कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या विखेंसह नितेश राणे यांनी त्यांचे भाऊ निलेश राणे यांचा प्रचार केला. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी उघडपणे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला. तर आमजाक जयकुमार गोरे यांनी आघाडीधर्म सोडून भाजपची मदत केली. तरीही काँग्रेसची सावध भूमिका पुढच्या समीकरणांचा भाग असल्याचं मानलं जातंय.

भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणायचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण त्याशिवाय काँग्रेसच्या अंतर्गत कलहाने पक्ष हैराण झाला. पक्षातले नेत्यांची कुरकुर तिकीट वाटपातही पाहायला मिळाली. पण तरीसुद्धा निकालाच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची गरज काँग्रेसला लागू शकते. त्याचमुळे काँग्रेस आता ताकही फुंकून पिताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

विखे पाटलांसह काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाईची शक्यता

अशोक चव्हाणांचा पक्ष संपवून काँग्रेसकडून आदर्श प्रकरणाचा बदला : नितेश राणे

Follow Us
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती