AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विखेंसह पाच आमदारांवर कारवाईसाठी काँग्रेस निकालाची वाट पाहणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला यशाची अपेक्षा आहे. पण असं असताना काँग्रेसला मदत न करणाऱ्या स्वपक्षीयांवर मात्र काँग्रेसने आस्ते कदम घेतल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास पाच नेत्यांवर काँग्रेसवर कारवाईसाठी हळूहळू पावलं उचलायचा पवित्रा घेतलाय. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करुनही काँग्रेसने कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही. काँग्रेसच्या पाच नेत्यांनी पक्षाविरोधात लोकसभा निवडणुकीत काम केलं. त्यात राधाकृष्ण विखे […]

विखेंसह पाच आमदारांवर कारवाईसाठी काँग्रेस निकालाची वाट पाहणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला यशाची अपेक्षा आहे. पण असं असताना काँग्रेसला मदत न करणाऱ्या स्वपक्षीयांवर मात्र काँग्रेसने आस्ते कदम घेतल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास पाच नेत्यांवर काँग्रेसवर कारवाईसाठी हळूहळू पावलं उचलायचा पवित्रा घेतलाय. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करुनही काँग्रेसने कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही.

काँग्रेसच्या पाच नेत्यांनी पक्षाविरोधात लोकसभा निवडणुकीत काम केलं. त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर चार आमदारांचा समावेश आहे. पण त्यांच्यावर कारवाई करताना काँग्रेसने आस्ते कदमची भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यापेक्षा लोकसभा निकालापर्यंत प्रतीक्षा करायच्या तयारीत काँग्रेस आहे. काही ठिकाणी काँग्रेस आमदारांनी स्वतःच्या पक्षाचंच काम केलं नाही, तर काही ठिकाणी आघाडीधर्म पाळलेला नाही. सर्वात मोठा प्रश्न काँग्रेससमोर विखे यांचा आहे. कारण विखे यांचं बडं प्रस्थ आहे. त्यात ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांचा पक्षाला उपयोग होऊ शकतो. म्हणून लगेच कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या विखेंसह नितेश राणे यांनी त्यांचे भाऊ निलेश राणे यांचा प्रचार केला. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी उघडपणे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला. तर आमजाक जयकुमार गोरे यांनी आघाडीधर्म सोडून भाजपची मदत केली. तरीही काँग्रेसची सावध भूमिका पुढच्या समीकरणांचा भाग असल्याचं मानलं जातंय.

भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणायचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण त्याशिवाय काँग्रेसच्या अंतर्गत कलहाने पक्ष हैराण झाला. पक्षातले नेत्यांची कुरकुर तिकीट वाटपातही पाहायला मिळाली. पण तरीसुद्धा निकालाच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची गरज काँग्रेसला लागू शकते. त्याचमुळे काँग्रेस आता ताकही फुंकून पिताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

विखे पाटलांसह काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाईची शक्यता

अशोक चव्हाणांचा पक्ष संपवून काँग्रेसकडून आदर्श प्रकरणाचा बदला : नितेश राणे

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.