AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे

टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत डेल्टा प्लस प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोणत्या प्रकारची काळजी घेत आहे, याची माहिती दिलीय. 15 मे पासून राज्य सरकारने याबाबत कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक - राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
| Edited By: sagar joshi | Updated on: Jun 23, 2021 | 10:17 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने चिंता वाढवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांचं प्रमाण कमी असलं तरी त्याचा संक्रमणाचा दर जास्त असू शकतो, अशी भीती टोपे यांनी यावेळी व्यक्त केलीय. टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत डेल्टा प्लस प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोणत्या प्रकारची काळजी घेत आहे, याची माहिती दिलीय. 15 मे पासून राज्य सरकारने याबाबत कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. (21 patients of Delta Plus variant of Corona in 7 districts of Maharashtra)

राज्य सरकार दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत. आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ अद्याप झालेली नाही. हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे डेल्टा प्लस प्रकार आढळलेले 21 रुग्णांचं विलगीकरण आपण करत आहोत. त्यांचं निरीक्षण केलं जात असून, त्यांच्याबाबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सुरु असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे सुदैवानं डेल्टा प्लसमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. केंद्र सरकारला ही माहिती पाठवण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

नव्या वेरियंटवर लस प्रभावी आहे का?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी BMC सज्ज, प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग

अमिताभ बच्चन यांच्याकडून शीव रुग्णालयाला 1.75 कोटींची वैद्यकीय यंत्रणा, आत्तापर्यंत अनेक रुग्णांवर प्रभावी उपचार

21 patients of Delta Plus variant of Corona in 7 districts of Maharashtra

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...