AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले, वयाच्या २५ व्या वर्षी वीरमरण, वाघाडीत जवानावर अंत्यसंस्कार

चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झालेले जवान मनोज माळी यांना वयाच्या 25 व्या वर्षी वीरमरण आलं. जवान मनोज यांचे पार्थिव वाघाडी गावात आल्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

चार वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले, वयाच्या २५ व्या वर्षी वीरमरण, वाघाडीत जवानावर अंत्यसंस्कार
| Updated on: Jul 09, 2023 | 3:47 PM
Share

धुळे : मनोज माळी हे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे मनात ठाणले होते. दहावीनंतर त्यांनी सैन्य भरती मारली. चार वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले. तेव्हापासून देशसेवा करणे सुरू होते. तीन दिवसांपूर्वी ते दरीत पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वाघाडी गावात शोककळा पसरली. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत सिक्कीम येथे असताना मनोज माळी यांना वीरमरण आले. या जवानावर साश्रू नयनांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या वाघाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी धुळे जिल्हा पोलीस तसेच भारतीय सैन्य दलाच्या वतीने बंदुकीच्या 21 फैरी हवेत झाडून मनोज माळी यांना मानवंदना देण्यात आली.

दरीत पडून मृत्यू

यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय शहीद जवान मनोज यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होता. सिक्कीम येथे एका ओपी पोस्टवर कार्यरत असताना अन्य जवानांसोबत मार्गस्थ होत असताना मनोज हे दरीत पडले. यात त्यांना वीरमरण आले.

घरासमोर रांगोळी काढून आदरांजली

चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झालेले जवान मनोज माळी यांना वयाच्या 25 व्या वर्षी वीरमरण आलं. जवान मनोज यांचे पार्थिव वाघाडी गावात आल्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. वाघाडी गावांमध्ये प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून मनोज यांना आदरांजली वाहण्यात आली.

मनोज यांच्या पार्थिवावर पृष्पवृष्टी

मनोज यांच्या अंत्ययात्रेपुढे यावेळी भव्य तिरंगा ध्वज घेत तरुणांनी अमर रहेच्या घोषणा देत रॅली काढली होती. गावात मनोज याच्या पार्थिवावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, जवान मनोज माळी अमर रहे .. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आजी-माजी सैनिक, प्रशासकीय अधिकारी, विविध लोकप्रतिनिधी यांनी मनोज यांना आदरांजली वाहिली.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.