AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा धोका वाढला! तुळजाभवानी दर्शन पासची संख्या निम्म्यावर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची संथ्या निम्यावर आणण्यात आली आहे. तसंच वृद्ध भाविक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आलाय.

कोरोनाचा धोका वाढला! तुळजाभवानी दर्शन पासची संख्या निम्म्यावर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
| Updated on: Feb 18, 2021 | 5:49 PM
Share

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे जिल्हा पातळीवर मोठे निर्णय घेतले जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख मंदिरांबाबतही निर्णय घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची संथ्या निम्यावर आणण्यात आली आहे. तसंच वृद्ध भाविक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आलाय.(Decrease in the number of Darshan passes of Tulja Bhavani temple)

जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश

राज्यातील मंदिरं सुरु केल्यानंतर तुळजाभवानी मंदिरात रोज 20 हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जात होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे आता ही संख्या निम्यावर आणण्यात आली आहे. आता रोज फक्त 10 हजार दर्शन पास दिले जाणार आहेत. तर 2 हजार पेड पास दिले जातील. त्याचबरोबर 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि 10 वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे. दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनसाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी असे 3 दिवस मोठी गर्दी असते. त्यामुळे हे 3 दिवस आणि मोठ्या सण, उत्सवाला 30 हजार मोफत पास दिले जात होते. तर इतर दिवशी 20 हजार मोफत पास दिले जात होते. पण आता ही संख्या निम्म्यावर आणण्यात येणार आहे.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोल्याला कोरोनाचा विळखा

विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्याती मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन अॅलर्ट झालं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, त्यामुळे ही शहरं अ‍ॅलर्ट झालीत.

औरंगाबादेत शाळा बंद

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील(Aurangabad   सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत. 12 आणि 10 चे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश येथील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय

मोठी बातमी: कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुनश्च: लॉकडाऊन

Decrease in the number of Darshan passes of Tulja Bhavani temple

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.