AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना संदर्भ देऊन दीपक केसरकर यांनी डिवचलं, 2018 मध्ये उद्धव ठाकरे काय केलं होतं?

बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत म्हणून आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांना संदर्भ देऊन दीपक केसरकर यांनी डिवचलं, 2018 मध्ये उद्धव ठाकरे काय केलं होतं?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 18, 2023 | 7:49 AM
Share

भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission ) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. खरंतर हा निर्णय उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाला मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन या निर्णयावर बोलत असतांना लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हंटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी हल्लाबोल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनीच कशी लोकशाहीची हत्या केली होती याबाबत दावा केला आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे आम्हाला मिळाले म्हणजे सत्याचा विजय झाला आहे. बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत म्हणून आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून 2018 मध्येच लोकशाहीची विटंबना झाली होती असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला आहे. शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करून नियुक्तींचे अधिकार एकट्याकडे घेतले होते असेही केसर यांनी म्हंटले आहे.

नियुक्तीचे अधिकार एकट्याकडे घेणाऱ्यांनी लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळा काढू नये अशी घणाघाती टीकाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

2018 ची घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाईल तेव्हाच ते उघडे पडतील असा दावा दीपक केसरकर यांनी करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आज खऱ्या अर्थाने झाला आहे. आमची बाजू सत्याची होती त्यामुळे आमचा विजय झाला आहे असेही दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांना मूळ विचारधारेसोबतच जायचे होते. ते तयारही झाले होते पण त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता. पण लोकशाहीचे धिंडवडे निघाले असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना नैतिक बळ आहे का ? असाही सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत 2018 मध्येच उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीची विटंबना केली असल्याचे म्हंटले आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...