AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना संदर्भ देऊन दीपक केसरकर यांनी डिवचलं, 2018 मध्ये उद्धव ठाकरे काय केलं होतं?

बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत म्हणून आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांना संदर्भ देऊन दीपक केसरकर यांनी डिवचलं, 2018 मध्ये उद्धव ठाकरे काय केलं होतं?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 18, 2023 | 7:49 AM
Share

भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission ) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. खरंतर हा निर्णय उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाला मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन या निर्णयावर बोलत असतांना लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हंटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी हल्लाबोल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनीच कशी लोकशाहीची हत्या केली होती याबाबत दावा केला आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे आम्हाला मिळाले म्हणजे सत्याचा विजय झाला आहे. बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत म्हणून आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून 2018 मध्येच लोकशाहीची विटंबना झाली होती असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला आहे. शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करून नियुक्तींचे अधिकार एकट्याकडे घेतले होते असेही केसर यांनी म्हंटले आहे.

नियुक्तीचे अधिकार एकट्याकडे घेणाऱ्यांनी लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळा काढू नये अशी घणाघाती टीकाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

2018 ची घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली जाईल तेव्हाच ते उघडे पडतील असा दावा दीपक केसरकर यांनी करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आज खऱ्या अर्थाने झाला आहे. आमची बाजू सत्याची होती त्यामुळे आमचा विजय झाला आहे असेही दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांना मूळ विचारधारेसोबतच जायचे होते. ते तयारही झाले होते पण त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता. पण लोकशाहीचे धिंडवडे निघाले असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना नैतिक बळ आहे का ? असाही सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत 2018 मध्येच उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीची विटंबना केली असल्याचे म्हंटले आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल