AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ‘संजय राऊतांच्या बोलण्याने आग लागते’, शिंदे गटाकडून संजय राऊतांबाबत उघड नाराजी व्यक्त

शिंदे गटातील नेते माजी गृह राज्यमंत्री केसरकर यांनी आपल्या मनातील खदखद आज बोलून दाखवली. ते यावेळी म्हणाले, संजय राऊत यांचा आम्हाला आदर आहे. मात्र त्यांच्याबद्दल तक्रारही आहे. याबाबत आम्ही आधी बोललो नाही. राऊत हे फायर आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे आग लागते.

Eknath Shinde : 'संजय राऊतांच्या बोलण्याने आग लागते', शिंदे गटाकडून संजय राऊतांबाबत उघड नाराजी व्यक्त
दिपक केसरकर आणि खासदार संजय राऊतImage Credit source: tv9
| Updated on: Jun 25, 2022 | 5:49 PM
Share

मुंबई : गेली पाच एक दिवस राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे राजकारण चांगलेच तापलेलं आहे. शिंदे यांनी बंडाळी करत ही महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले. तसेच शिवसेने यातील बाहेर पडावे आणि भाजपशी घरोबा करावा असे म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेकडून हा बंडनिकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे शिवसैनिकांकडून फुटीर आमदार आणि नेत्याविरोधात निर्दशने केली जात आहेत. तर फुटलेल्या शिंदे गटावर शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे टीका करताना हल्ला करत आहेत. यावर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. तर त्यांच्यावर आक्षेपही नोंदवले आहेत. असाच आक्षेप शिंदे गटात गेलेले माजी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊत यांच्यावर केला आहे. राऊतांवर आक्षेप करत केसरकर म्हणाले, राऊत्यांच्या बोलण्याने आग लागते. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद करत नाही.

त्यांच्याशी थेट कधी संबंध येत नाही

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार खाळी खेचण्याची पुर्ण तयारी केली आहे. शिंदे यांनी आपल्या सोबत तब्बल 40 ते 45 आमदार नेले आहेत. ज्यात शिवसेनेचेही आमदारही आहेत. ज्यामुळे सनेनेला खिंडार पडले आहे. तर हा पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मात्र या प्रयत्नांना कुठेतरी सुरूंग लागण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. याचबाबतीत शिंदे गटातील नेते माजी गृह राज्यमंत्री केसरकर यांनी आपल्या मनातील खदखद आज बोलून दाखवली. ते यावेळी म्हणाले, संजय राऊत यांचा आम्हाला आदर आहे. मात्र त्यांच्याबद्दल तक्रारही आहे. याबाबत आम्ही आधी बोललो नाही. राऊत हे फायर आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे आग लागते. त्यांच्या याच बोलण्यामुळे मार्गी लागणारे विषय ही संकटात सापडतात. तसेच ते विधीमंडळाचे सदस्यही नाहीत. त्यामुळे आमचा त्यांच्याशी थेट कधी संबंध येत नाही. तसेच मी त्यांनी त्यांचा स्वभाव बदला असेही बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक बोलणं योग्य नसल्याचेही केसरकर म्हणाले.

आम्ही विरोध करणारच

तसेच यावेळी केसरकर यांनी अनेक विषयांना हात घालताना, शिवसेनेच्या नावाचा वापर करू नका असे ते म्हणत असतील तर आम्ही तसे करू असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी असही म्हटलं की, आजच्या घडीला असे अनेक नेते आहेत जे पक्षाच्या चिन्हा शिवाय निवडूण येऊ शकतात. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपद घेण्यावर बोलताना, मुख्यमंत्रिपद घेऊन जर शिवसेना संपणार असेल, तर आम्ही विरोध करणारच असल्याचे सांगितले. विकासाची काम करुन शिवसेना मोठी होईल. जेव्हा विरोधात शिवसेना होती तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, मात्र आता शिवसेना सत्तेत आहे. जनतेच्या आपल्याकडून या अपेक्षा वाढल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेकडे बोट दाखवत होते

तसेच त्यांनी हे जे काही आता सुरू झाले नसल्याचे म्हणत याची ठिणगी ही राज्यसभेवेळीच पडल्याचे म्हटलं आहे. तर ज्यावेळी मतं फुटली होती. ती काही शिवसेनेची नव्हती. मात्र लोक शिवसेनेकडे बोट दाखवत होते, शिवसेनेच्या लोकांनी वेगळीकडे मतदान केलं, त्यानंतरच ही वेळ आल्याचेही केसरकर म्हणाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.